Kolhapur Ham radio : पावसाळ्यात अनेक (Pune news) शहरात पूर परिस्थिती निर्माण होते. त्यात अनेक लोकांचं नुकसान होतं आणि या परिस्थितीत अनेक पूरग्रस्तांपर्यंत जीवनावश्यक वस्तू लोकांपर्यंत पोहचत नाही. माहिती देणारे यंत्र काम करत नाही त्यामुळे अनेक नागरिकांना वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो. यामुळेच संपर्क नीट व्हावा म्हणून एआयएसएसएमएस आयओआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय (AISSMS  Engineering College), आयइइइ एचएसी साईट ग्रुप आणि रेडियो अम्याच्युर क्लब ऑफ कोल्हापूर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिली बिनतारी संदेश यंत्रणा हॅम रेडिओ (Ham radio) हा प्रकल्प कोल्हापूर येथे कार्यान्वित केला.मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलं.



गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रातील कोल्हापूर भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे कृष्णा खोऱ्यातील पाण्याची पातळी वाढल्याने जुलै 2020 आणि 2021 मध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूर आला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात हजारो लोक अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंशिवाय अडकले.  बचाव कार्यात गुंतलेल्या अधिकार्‍यांनी कबूल केले की दळणवळणाचा अभाव हा एक मोठा अडथळा होता कारण प्रभावित लोक मदतीसाठी कोणाशीही संपर्क साधण्याच्या स्थितीत नव्हते. एचएएम रेडिओ विकसित देशांमध्ये खूप लोकप्रियपणे वापरला जात असला तरी, तो विशेषतः आपत्ती व्यवस्थापनासाठी भारतात वापरला गेला नाही. 



AISSMS IOIT, पुणे यांनी विशेषत: आपत्ती व्यवस्थापनासाठी संप्रेषण स्थापित करण्याच्या उद्देशाने एक प्रकल्प सुरू केला आणि त्यानंतर गरजेच्या काळात विश्वसनीय संवाद साधण्यासाठी HAM रेडिओ स्टेशनची स्थापना केली. जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर इतर सर्व संदेश देवाणघेवाण यंत्रणा बंद होतात अशा वेळेस आपत्कालीन परिस्थितीमध्ये माहिती पोहचवण्यासाठी ही यंत्रणा महत्वाची कामगिरी बजावते. कोल्हापूर जिल्हा आणि करवीर तालुक्यातील आंबेवाडी आणि चिखली ही गावे हॅम रेडियोच्या सहाय्याने जोडण्याचे काम या प्रकल्पांतर्गत केले आहे.


 चिखली  आणि आंबेवाडी या भागांत पहिला प्रयोग


प्रकल्प प्राचार्य डॉ.पी.बी.माने यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला. या प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ.सारिका पनवर, सह अन्वेषक डॉ.राकेश धुमाळे, सह प्राध्यापक  एआयएसएसएमएस आयओआयटी  महाविद्यालय हे आहेत या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी रेडिओ क्लब ऑफ कोल्हापूरचे नितीन ऐनापुरे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, कोल्हापूरचे अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ यांनीही सहकार्य केलं आहे. चिखली  आणि आंबेवाडी या भागांमध्ये संदेश देवाणघेवाण करून या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मालोजीराजे छत्रपतींनीदेखील शुभेच्छा दिल्या.