पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) पुन्हा एकदा उद्वव ठाकरे (Udhav Thackray) यांच्या फेसबूक लाईव्हवरुन जहरी टीका केली आहे. 'काही लोक घरात बसून फेसबुक लाईव्ह (facebook Live) करायचे आणि आता ते पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) टीका करतात. आता मोदींची वक्रदृष्टी जर यांच्यावर पडली तर फेसबुकवर बोलणाऱ्याच्या तोंडाला फेस येईल, असं ते म्हणाले आहेत. पुण्यात आज महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यासोबतच त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि वंचितचे उमेदवार वसंत मोरे (Vasant More) यांच्यावर देखील नाव न घेता टीका केली. 


मुख्य़मंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?


'नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात केलेले काम हे काँग्रेसला मागील 50 वर्षात जे जमले नाही ते काम केले आहे. जगात देशाची प्रतिमा उंचावली असून देश बोलतो ते जग ऐकत आहे असे वातावरण आहे.  कोरोना काळात काही लोक घरात बसून होते ते नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहे. त्यांनी वक्रदृष्टी केल्यास फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडाला फेस येईल. बोलताना जरा भान बाळगा', अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. 


उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील; मुख्यमंत्री


कार्यकर्ता ज्यावेळी सक्रिय होतो तेव्हा सर्वत्र राज्यात महायुती वातावरण दिसून येत आहे. आता मनसेने आपल्याला पाठिंबा दिला आहे, आपली ताकद मोठी आहे. आपल्या महायुतीचं वातावरण राज्यभर आहे. पुणे लोकसभेचे उमदेवार मुरलीधर मोहोळ आणि इतर आपले सगळे उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील, कारण आपले कार्यकर्ते चार्ज आहेत.गेल्या 30 वर्षांपासून आपली नैसर्गिक युती आहे. त्यामध्ये काही विघ्न आली, पण आपण पुन्हा युती केली आणि आता अजित पवार सोबत आले. आपली महायुती मजबूत झाली. अनेक लोक म्हणत होते की सरकार पडणार पडणार, आता बंद झालं आहे असं म्हणणं. आता तर मनसेनेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आपली ताकद वाढली आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 


इतर महत्वाची बातमी


-मी जे सांगायचे ते सांगितलं, मला मूर्ख समजू नका; 'त्या' प्रश्नावरुन अजित पवारांनी पत्रकारांना फटकारलं!


-मतदार जागृतीच्या बोर्डावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’; पुण्यातील गोखले संस्थेत नेमका कोणता प्रकार घडला?