पुणे :  कांद्याला हमीभाव द्या, ही मागणी केल्याने मला आणि खासदार अमोल कोल्हेंना संसदेतून एक दिवसासाठी निलंबित कऱण्यात आलं होतं. ही सरकारची दडपशाही आहे. यंदाच्या निवडणूकीत आम्ही दहपशाहीच्या विरोधात लढणार आहोत, असं बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी माहाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकरांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

Continues below advertisement

'संसदेत मी आणि अमोल कोल्हे यांनी कांद्याचा प्रश्न कायम उपस्थित केला. मात्र या च प्रश्नावरुन आम्हाला संसदेतून एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं होतं. आम्ही कोणत्याही प्रकारचं वाईट कृत्य केलं नव्हतं तर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. होते. शिवाय कांद्याला हमीभाव द्या, एवढी साधी मागणी सरकारकडे केली असताना त्यांनी आम्हाला निलंबित केलं होतं. त्यामुळे हे सरकार कायम दडपशाही करत आलं आहे. ही दडपशाही आता चालणार नाही. आमची लढाई ही या दहपशाही विरोधात आहे', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हेच फुलेंना अभिवादन; अमोल कोल्हे

यावेळी सुप्रिया सुळेसोबत अमोल कोल्हेदेखील उपस्थित होते. ते म्हणाले की,आजचा शेतकरी हा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पिचलेला आहे. महात्मा फुले यांनी 1883 मध्ये शेतकऱ्याच्या अवस्थेचे एवढे प्रभावी व वास्तवदर्शी चित्रण महात्मा फुल्यांनी केले आहे त्याला तोड नाही. वर्तमानात यात किंचीतही बदल झालेला नाही. त्यामुळे या चुकीच्या शेती विषयक धोरणांच्या विरोधात हाच असूड उगारण्याची वेळ आली, असं अमोल कोल्हे म्हणाले. फुल्यांनी शेतकऱ्यांची स्थिती स्वतंत्र भारतात अजून हलाकीची झालेली आहे. महात्मा फुले यांनी 1883 मध्ये 'शेतकऱ्याचा असूड' हा  ग्रंथ लिहिला. शेतकऱ्याच्या विदारक परिस्थितीचे चित्रण यात करून त्याच्या विकासाचा मार्गही सांगितला आहे, असही ते म्हणाले. सध्या कांदा उत्पादक शेतकरी असो की सोयाबीन, दूध उत्पादक शेतकरी असो केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अल्पभूधारक शेतकरी हा नागवला जात आहे. त्याविरोधात आवाज उठवण, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हेच फुलेंना आमचं अभिवादन असेल असंही ते म्हणाले. 

Continues below advertisement

इतर महत्वाची बातमी-