बर्थडे पार्टीतील वादामुळे मावसभावाकडून बालाजी कांबळेंची हत्या?
एबीपी माझा वेब टीम | 27 Jun 2018 08:09 AM (IST)
दोन महिन्यांपूर्वी वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या भांडणातून मावसभावानेच आळंदीतील नगरसेवक बालाजी कांबळे यांची हत्या केल्याचा संशय आहे.
पिंपरी चिंचवड : आळंदी नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक बालाजी कांबळे यांच्या हत्येचं गूढ उकलण्याची चिन्हं आहेत. दोन महिन्यांपूर्वी वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या भांडणातून मावसभावानेच कांबळेंची हत्या केल्याचा संशय आहे. वाढदिवसाच्या पार्टीतील भांडणामुळे हे हत्या झाल्याची फिर्याद कृष्णा राजकुमार घोलप यांनी दिघी पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी देहूफाटा भागात राहणारा कांबळेंचा मावसभाऊ अजय संजय मेटकरीवर गुन्हा दाखल करण्यात आला.