Sharmila Thackeray, मुंबई : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील राजकोट (Rajkot Fort) किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा अवघ्या 9 महिन्यांत कोसळ्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हा पुतळा नौदलाकडून उभारण्यात आला होता, असा दावा केलाय. तर विरोधी पक्षांकडून या घटनेला राज्य सरकारला जबाबदार धरलं जात आहे. दरम्यान, याबाबत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. 


पडलेला पुतळा जो दाखवत आहेत, तो अखंड पोकळ पुतळा होता


प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार करता, निदान छत्रपतींना तरी सोडा, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा बनवण्यात आलेला पुतळा आतून पोकळच होता. पोकळ पुतळा कोणी समुद्र किनारी उभं करत का? महाराजांनी बांधलेले गड-किल्ले आजही तसेच आहेत आणि 8 महिन्यांमध्ये यांनी बांधलेला पुतळा कोसळला, असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे. पडलेला पुतळा जो दाखवत आहेत, तो अखंड पोकळ पुतळा होता. असा पोकळ पुतळा समुद्र किनारी कोण उभं करत? असा सवालही शर्मिला ठाकरे यांनी केला आहे. 


छत्रपतींनी 350 वर्षांपूर्वी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला अजूनही उभा आहे


पुढे बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, छत्रपतींनी 350 वर्षांपूर्वी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला अजूनही उभा आहे. किंवा त्यांचे इतके गड-किल्ले आहेत, प्रतापगड धरा किंवा रायगड धरा. तटबंदी का असेना पण ती अजूनही उभी आहे. त्याच्यापेक्षा जास्त वारा ही तटबंदी सोसते. पण मला दु:ख वाटतं. तुम्ही कमीत कमी छत्रपतींना तरी सोडा. मुंबई-नाशिक रस्त्यामध्ये भ्रष्टाचार आहे. इतके खड्डे आहेत. मुंबई-गोवा महामार्गाबाबत आम्ही आंदोलन करुन थकलो. कोकणचे लोक काय रक्ताचे आहेत? ते अजूनही या लोकांवर विश्वास ठेवतात, असं मतही शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलं. 


राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुरुवारी (दि.29) सलग दुसऱ्या दिवशी किल्ल्यावर फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. ही फॉरेन्सिक टीम कोल्हापूरवरुन आली आहे. या टीमकडून सध्या घटनास्थळाची पाहणी केली जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


MLA Rohit Pawar on Shivaji Maharaj Statue : वारेSS व्वाSS सरकार! शिवरायांचा पुतळा 2.40 कोटींचा अन् तात्पुरत्या हेलिपॅडसाठी 2.2 कोटींचा खर्च! आमदार रोहित पवारांचा हल्लाबोल