Sanjay Raut on Congress: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेमध्ये संभाव्य युती जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचा कोणता मार्ग असेल, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी मोठं विधान केलंय. “राज ठाकरे काय, आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतही आघाडी करून लढणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असताना देखील हीच भूमिका घेतली होती आणि आजही तीच भूमिका कायम आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. तर राज्यातील इतर काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी देखील राज ठाकरेंना विरोध दर्शवला आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेस नेत्यांना टोला लगावलाय.  

Continues below advertisement

संजय राऊत म्हणाले की, मुंबई महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणीतरी वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही मित्र पक्षांना अडचणीत येणारी कोणतीही भूमिका घेणार नाही. राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आहेत. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांच्यामुळे कोणी भूमिका घेत असेल तर तोही त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा आहे. आम्हाला मुंबई अडाणीच्या घशात घालण्यापासून वाचवायची आहे. या मुंबईसाठीच संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती. त्यात सुद्धा सर्व पक्ष एकत्र आले होते. काँग्रेसच्या नेत्यांना हा इतिहास समजून घेणे फार गरजेचे आहे. आता त्याच प्रकारचं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखं वातावरण मुंबईत आहे, असे त्यांनी म्हटले.  

Sanjay Raut on Congress: बिहारमध्ये काय राज ठाकरे आहेत का?

संजय राऊत पुढे म्हणाले की, बिहारमध्ये काय राज ठाकरे आहेत का? बिहारमध्ये बऱ्याच ठिकाणी तेजस्वी यादवचं वाजलं आहे आणि वेगवेगळ्या निवडणुका लढत आहेत. बिहारमध्ये राज ठाकरे नाहीत. निवडणुका जवळ आल्या तरी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता जलात भांडण सुरू आहे. मग तिथे राज ठाकरे आहे का? तिथे उद्धव ठाकरे आहे का? आम्हाला हे नको, ते नको. हे एक दिवसाचे प्रसिद्धीचे वाक्य असतात. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. ती मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे. त्यामुळे काँग्रेस पक्षातल्या मराठी नेतृत्वाने मुंबईवरचं पुढील संकटाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.

Continues below advertisement

Sanjay Raut on Congress:  ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी

आम्हाला जर काही बोलायचं असेल तर आम्ही राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाल आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी बोलू. या चारही प्रमुख लोकांशी या विषयावर अद्याप साधी चर्चा देखील झालेली नाही. त्यामुळे उगाच त्याच्यावर अकांडतांडव करण्यात अर्थ नाही. आम्ही सगळे एकत्र येऊन एक नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढत आहोत. त्यात काँग्रेसला देखील आमंत्रण आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष, डावे पक्ष असे सगळे पक्ष आम्ही एकत्र आहोत. ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे. हे काँग्रेसने समजून घेतले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.  

 Sanjay Raut on Congress: आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधानच करायचा होता

आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधानच करायचा होता. पण होऊ शकला नाही. आम्ही इंडिया ब्लॉक निर्माण केला, तेव्हा आम्हाला राहुल गांधींना पंतप्रधान करायचे होते. त्यावेळी आम्ही असे म्हणालो नाही की, शिवसेनेचा करायचा आहे की अन्य पक्षांचा करायचा आहे. आमचा विचार आणि आमची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेस दिल्लीमध्ये सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे आमचे मन फार मोठे आहे आणि आम्हाला राहुल गांधी यांनाच पंतप्रधान करायचे आहे. हे महाशय मुंबईच्या महापौराबद्दल काय घेऊन बसले आहेत? तुम्ही 27 महानगरपालिकेचे महापौर काँग्रेसचे करा. आम्हाला काही अडचण नाही. भारतीय जनता पक्षाला रोखणं ही आमची भूमिका आहे. महापौर हा मराठी मातीतला होणे याला आम्ही प्राधान्य देत आहोत. मुंबईवर गेल्या 30 वर्षांपेक्षा जास्त काळ शिवसेनेचा महापौर, मराठी महापौर झालेला आहे. त्याचे श्रेय हे शिवसेनेला द्यावे लागेल. अनेकदा आम्ही काँग्रेसचे देखील सहकार्य घेतले हे आम्हाला विसरता येणार नाही. त्यामुळे काँग्रेसचे नेते मुंबईत काय बोलताय? बाहेर काय बोलताय? मला वाटत नाही की, काँग्रेस पक्षामध्ये अशा प्रकारचे तीव्र मतभेद आहेत. हा त्यांचा अंतर्गत वाद उफाळून आला असेल, असा म्हणत त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधला. 

आणखी वाचा 

Bhai Jagtap on BMC Election 2026: काँग्रेस BMC निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत लढणार नाही, भाई जगताप यांचा दावा