Rais Shaikh on Toll Free For Light Vehicles: मुंबई शहरात प्रवेश करणाऱ्या पाच टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना आजपासून जशी पूर्ण टोलमाफी दिली (Mumbai Toll Waiver), तशी टोलमाफी संपूर्ण राज्यात लागू करावी, अशी मागणी भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख (Rais Shaikh) यांनी केली आहे. तसेच नाशिक महामार्गाची टोल कंपनी दुरुस्ती करत नसल्याने पडघा टोलनाका बंद करण्याची मागणीही रईस शेख यांनी केली आहे.


यासंदर्भात आमदार रईस शेख म्हणाले की, मुंबई एन्ट्री पाँइंटचे जे पाच मुख्य मार्ग आहेत, त्यांची दुरुस्ती टोल कंपन्यांकडून वेळेत कधीच होत नाही. तरीसुद्धा आजपर्यंत या पाचही मार्गावर वाहनांना टोल भरावा लागतो आहे. ही जनतेची लूट आहे. त्यासदंर्भात मी वेळोवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र पाठवून टोल रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. नियमबाह्य टोल वसुलीचा प्रकार राज्यात सर्वत्र आहे. उदाहरण नाशिक महामार्गाचे घ्या. या महामार्गावर टोल कंपनी रस्त्याची दुरुस्ती करत नाही. तरीसुद्धा पडघा येथे टोल वसूल केला जात आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात टोल कंपन्यांची अशी लूट सुरु आहे. ही सामान्यांची वाटमारी आहे. ती शासन कधी थांबवणार आहे, असा सवाल आमदार रईस शेख यांनी महायुती सरकारला केला आहे.


कडक लक्ष ठेवल्यास राज्यातले 50 टक्के टोल बंद होतील- रईस शेख


टोलवसुलीची माहिती संकेतस्थळावरून दिली पाहिजे, असे परिपत्रक केंद्र सरकारने 2013 साली काढले आहे. मात्र, केंद्र सरकारच्या आदेशाला सर्व टोल कंपन्या आणि राज्यांनी केराची टोपली दाखवली आहे. रस्त्याचा खर्च निघूनही शेकडो टोल सुरु आहेत, असा आरोप आमदार रईस शेख यांनी केला. सरकारने टोल कंपन्यांवर कडक लक्ष ठेवल्यास राज्यातले 50 टक्के टोल बंद होतील, असे आमदार रईस शेख म्हणाले.


मुंबई टोलमुक्त करा - रईस शेख


मुंबईत येणारे 5 एन्ट्री पॉईंटचे रस्ते आणि शहरातील 27 फ्लायओवर्स यांची देखभाल आणि दुरुस्ती टोल कंपन्या यांच्याकडून होत नाही. त्यामुळे मुंबई पूर्णपणे टोलमुक्त करावी, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जानेवारी 2023 मध्ये पत्र लिहून केली होती.


हे ही वाचा