Prithviraj Chavan, Satara Meeting : "ही निवडणूक महत्वाची आहे. आपली राज्यघटना शिल्लक राहणार आहे की नाही? लोकशाही टिकणार आहे की नाही? याचा फैसला या निवडणुकीतून होणार आहे. राष्ट्रवादीने 3 वेळेस खासदार करुन पाठवलं, एकदाही आम्हाला भेटायला परत आला नाही. आम्ही इथं मत देणार नाहीत. आम्ही एकाबाजूला 2 आमदार आहोत. त्यांच्याकडे 4 आमदार आहेत. पालकमंत्री तिकडे आहेत. त्या पदाचा वापर रोज केला जातोय. शिंदे-फडणवीस सरकारशी आपल्याला लढायचे आहे. आपल्याला माहिती आहे की, विरोधी पक्षाच्या खासदारांनी गद्दारी केली. तीनदा निवडून दिलं तरीही पक्ष बदलला. तेव्हा श्रीनिवास पाटलांनी त्यांना पराभूत केलं. आता तर 3 पक्ष आपल्यासोबत आहेत", असे काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले. त्यांनी भाजप उमेदवार उदयनराजे भोसले (Udaynraje Bhosale) यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला. साताऱ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) बोलत होते. यावेळी शरद पवारही (Sharad Pawar) उपस्थितही होते. 



खोक्यांचा बाजार केला, काही जणांना राज्यसभा दिली


पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, तीन पक्ष एकत्र आले आहेत, त्यामुळे आता मताधिक्य वाढलं पाहिजे. महागाई, बरोजगारी, शेतकरी आत्महत्या, भ्रष्ट्राचार, नैतिक भ्रष्ट्राचार हे महत्वाचे मुद्दे आहेत. ऑपरेशन लोटसच्या नावाखाली नैतिक भ्रष्ट्राचार केलाय. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील सरकार पाडलं. खोक्यांचा बाजार केला, काही जणांना राज्यसभा दिली. आज इंडिया आघाडीच्या वतीने शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. अचानक उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना निवडून देण्याचे काम आपण करुयात, असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं.


पाटण तालुक्यातील लोक उड्या मारत आहेत


पुढे बोलताना चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, डोंगरी भागतील उमेदवार आहे. तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करतील. पाटण तालुक्यातील काही  लोक उड्या मारत आहेत. पण सर्व लोक शशिकांत शिंदे यांच्या पाठिशी आहेत. पवार साहेबांनी सर्व महाराष्ट्र ढवळून काढलाय. त्यामुळे या निवडणुकीत गद्दारांना त्यांची जागा दाखवली जाईल. तिन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत. फुले-शाहू -आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवायचा आहे. या साताऱ्यात एकदाही जातीवादी विचारांचा खासदार झाला नव्हता. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Yash : खिशात 300 रुपये घेऊन सोडलं घर, आज एका चित्रपटासाठी घेतोय 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक मानधन; वाचा 'रॉकी भाई'ची स्ट्रगल स्टोरी