माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले आहेत की, अनेक लोकांनी वेवेगळे अर्थ काढले, त्यावेळी अप्रत्यक्षपणे सगळ्यांचाच त्याला पाठिंबा आहे. असं समजलं गेलं. मात्र तशी वस्तुस्थिती नव्हती. त्यानंतर या घटनाक्रमाचा फायदा हा आमचं सरकार स्थापन होण्यासाठी झाला. ही गोष्ट सगळ्यांसमोर आहे. त्यामुळे ते कोणी जाणीवपूर्वक केलं आहे, असं मी म्हणत नाही. मात्र त्याचे जे फायदे झाले, ते सगळ्यांच्या समोर आहेत.             


Jayant Patil On Sharad Pawar : काय म्हणाले होते जयंत पाटील?


23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि अजित पवार (ajit pawar) यांचा पहाटेचा शपथविधी झाला होता, यावरच बोलताना जयंत पाटील म्हणाले होते की, "मला वाटत नाही की अजित पवार भुलले असतील. त्यावेळी राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने खेळलेली एखादी खेळी असू शकते. त्यामुळे अजित पवारांनी त्यावेळी जी वक्तव्ये केली त्याला फार महत्त्व आहे, असं मला वाटत नाही. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री बनून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात काम केलं. स्पष्टपणे कारभार केला. राष्ट्रवादी फुटली नाही. शिवसेनेचेच आमदार आमदार गेले म्हणून सरकार कोसळलं. राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत ठामपणे साथ दिली हे आपल्याला नाकारता येणार नाही."


दरम्यान, 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उप मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. या पहाटेच्या शपथविधीची चर्चा अजून सुद्धा सुरू आहे. यावरूनच केलेल्या वक्तव्यावरून जयंत पाटील यांनी घुमजाव केला आहे.


इतर महत्वाची बातमी: 


Deepak Kesarkar on Deepak Kesarkar : बाळासाहेबांचा वारसा गेला, आता काँग्रेसचा वारसा घेतला आहे, उद्धव ठाकरे स्वतः मिंधे; दीपक केसरकरांचा हल्लाबोल