मुंबई : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून मुंबईतील आझाद मैदानात मोठ्या संख्येने राज्यभरातून मराठा बांधव जमले आहेत. दुसरकीडे सरकारने जरांगे पाटील यांच्याशी चर्चेची तयारी सुरू केली असून मराठा आरक्षणासाठीच्या शिंदे समितीचे प्रमुख माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे हे आझाद मैदानावर चर्चेसाठी पोहोचले. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एबीपी माझाच्या कार्यालयात बाप्पांची आरती केल्यानंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सविस्तरपणे माहिती दिली. राजकारण चुलीत गेलं, पण समाजा-समाजात तेढ करणं आमच्या तत्वात बसत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.   

Continues below advertisement


मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात सरकारची भूमिका पहिल्या दिवशीपासून स्पष्ट आहे. 2014 पासून ते 2025 पर्यंत मराठा समाजाच्या जे जे हिताचे निर्णय झाले ते आमच्या सरकारनेच घेतले. त्यात, आरक्षणाचा विषय असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आपण एवढं सबळ केलं की, आज दीड लाख उद्योजक जे नोकऱ्या देणारे मराठा तरुण तयार करु शकलो. सारथीमुळे एमपीएससी आणि युपीएससीमध्ये मराठा तरुणांचा टक्का वाढलेला आहे, शिक्षण आणि रोजगार या प्रश्नावर आपण निर्णय घेतलेले आहेत. जे 10 टक्के आरक्षण आपण दिलंय, ते टिकलेलं आहे. पण, काहींची वेगवेगळी मतं आहेत, असे म्हणत राज्यात युती आणि महायुतीच्या सरकारनेच मराठा समाजासाठी चांगले निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी एबीपी माझाच्या स्टुडिओतून सांगितलं. 


कोणत्या राज्याला वाटत असेल की, आपल्या राज्यातील मोठा घटक अंसतुष्ट राहावा, त्याच काय फायदा आहे. पण, एकाच्या संतुष्टीकरता दुसऱ्याला त्याच्यासमोर भांडणासाठी उभं करा, दुसऱ्याला असंतुष्ट करा हे आम्हाला मान्य नाही. राजकारण चुलीत गेलं पण अशाप्रकारे समजा-समाजामध्ये तेढ निर्माण करणं हे आमच्या तत्वात कुठेही बसत नाही. म्हणून, आमचा प्रयत्न हा सगळ्याचं समाधान कसं निघेल हा आहे, ते संविधानाच्या चौकटीत बसवून काढावं लागेल, असे मुख्यमंत्र्‍यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. 


संविधानाच्या चौकटीतून निर्णय होईल


आपण कुणाला तरी आनंद देण्याची आज एखादी गोष्ट केली तर उद्या अधिक जोराने त्याचा बॅकक्लॅश आपल्याकडे येईल, त्यामुळे संविधानाच्या चौकटीतून जे काही निर्णय करायचे आहे ते आपल्यला करायचे आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाच्या प्रश्नावर स्पष्टपणे भूमिका मांडली. 



हेही वाचा


मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको; नागपूरच्या मुधोजीरांजेंच्या जरांगे पाटलांना शुभेच्छा, पण मागणी वेगळी