Nagarparishad Election Result : राज्य निवडणूक आयोगाने हा प्रचंड मोठा घोळ घातला आहे. आम्ही नियमाने बोलल्यावरही राज्य निवडणूक आयोगाने ऐकले नाही. हे चुकीच्या पद्धतीने चालले आहे. ज्या पद्धतीने राज्य निवडणूक आयोगाने घोळ घातला, त्याप्रमाणे आता त्यांनी पुढे जावे. आगामी निवडणुका मोठ्या आहेत. हा घोळ राज्य निवडणूक आयोगाने संपवावा. नाहीतर आम्ही प्रचार करायचा आणि निवडणूक आयोगाने एक पत्र काढून निवडणुका पुढे ढकलायच्या हे काही योग्य नाही. राज्य निवडणूक आयोगाने चुकीचा अर्थ काढून निवडणूक पुढे ढकलल्या, सरसकट निवडणूक पुढे ढकलणं योग्य नाही. हा निर्णय अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिलीय.
नागपूर खंडपीठाच्या जो निर्णय आहे तो राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला मान्य करावा लागतो. अशा पद्धतीने निवडणूक पुढे न ढकलण्यासंदर्भात मी वारंवार निवडणूक आयोगाला विनंती केली होती. मात्र नियमांचा चुकीचा अर्थ काढला जातोय. कारण या संदर्भात कोणीही हरकत अथवा तक्रार केली नव्हती. नियमांचा चुकीचा अर्थ काढून निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे ठकलल्या. किंबहुना पुढे ढकलायच्याच होत्या तर ज्या ठिकाणी आक्षेप होत्या त्या ठिकाणी या निवडणुका पुढे ढकलायच्या होत्या. मात्र आजवरच्या राज्य निवडणूक आयोगाच्या कामकाजात असे प्रथमच झालं असावं, असेही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Chandrashekhar Bawankule : या घोळ अनाकलनीय, नागरिकांना वेठीस धरून चुकीचा निर्णय
निवडणूक वाढवणे, थांबणे अथवा अशा पद्धतीने घोळ निर्माण करणे हे योग्य नाही. त्याचं समर्थन कोणीही अथवा कुठल्याही राजकीय पक्षाने केलेला नाही. कधीही सर्वपक्षीय बैठक नाही, विचार विनिमय नाही, एकप्रकारे हे जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार असल्याची टीकाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. स्वतः मी अनेकदा चर्चा केली, मात्र आज निवडणूक आयोगाच्या घोळामुळे असा निर्णय समोर आलाय. हे चुकीचं असून अनके उमेदवारांसह राजकीय पक्षाची निराशा झाली आहे. असेही ते म्हणाले. या घोळ अनाकलनीय आहे. राज्यातील नागरिकांना वेठीस धरून शेवटच्या घटकेत असे निर्णय घेणं हे अजिबात योग्य नाही, असे म्हणत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा