छत्रपती संभाजीनगर: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने (Shiv Sena UBT) नुकतेच आपला सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसचा (Congress) एक बडा नेता फोडला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) आगामी महापालिका निवडणूकीच्यापूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का देण्यात आलाय. काँग्रेसची साथ सोडत काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशिद खान उर्फ मामू (Former mayor Rashid Khan) यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी अब्दुल रशिद खान यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते आणि माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. मात्र याच पक्षप्रवेशावरून छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

Continues below advertisement

काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशिद खान उर्फ मामू यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला खरा, मात्र या प्रवेशानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी थेट विरोध दर्शवला. “माझा तुला विरोध आहे,” असे म्हणत खैरे कमालीचे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेमुळे शिवसेना पक्षात एकच खळबळ उडाली असून खान आणि खैरे नव्यानं आमने-सामने आल्याचे चित्र दिसून आले.

Chandrakant Khaire : 'ज्यांनी दगडफेक केली त्यांना प्रवेश, तिकीट दिलं तर पहा मी काय करतो'

Continues below advertisement

काँग्रेस पक्षातून नुकतेच ठाकरे गटात आलेले माजी महापौर रशीद मामू यांना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उघड विरोध केला आहे. रशीद मामू जरी पक्षात आले असले तरी त्यांना मी तिकीट मिळू देणार नाही, असं चंद्रकांत खैरे म्हणाले. याच वेळी रशीद मामू यांनी चंद्रकांत खैरे यांची गळाभट घेण्याचा प्रयत्न केला असता चंद्रकांत खैरे यांनी नकार दिला. तुम्ही जरी गळाभेट घेत असला तरी तुम्हाला तिकीट मिळणार नाही, असा सज्जड दम चंद्रकांत खैरे यांनी रशीद मामू यांना दिलाय. तर रशीद मामू यांच्या प्रवेश झाल्याने 50 हजार मतांचं नुकसान झालंय, ज्यांनी दगडफेक केली त्यांना प्रवेश दिला. त्यांना आता तिकीट दिलं तर पहा मी काय करतो, असा थेट इशाराही चंद्रकांत खैरे यांनी एकप्रकारे पक्षश्रेष्ठींनाही दिल्याचे बघायला मिळालंय.

Ambadas Danve : शिवसेनेचे पक्ष प्रमुख पक्षात मुख्य आहेत, त्यांनी प्रवेश दिला

दरम्यान याच वादावर शिवसेना नेते आणि माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देत या पक्षप्रवेशावर स्पष्टीकरण दिलंय. शिवसेनेचे पक्ष प्रमुख पक्षात मुख्य आहेत, त्यांनी प्रवेश दिला. खैरे साहेब नेते आहेत, उद्धवजी निर्णय घेतील. सर्वेमध्ये जे होईल त्याला उमेदवारी देऊ. आज कोणाचा भरवसा नाही, कोण नंतर कुठे जाईल कोणासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी असं असल्याने कोणासाठी शब्द देणे अवघड झाले आहे. मग अब्दुल सत्तार कसे चालतात? त्यांनी हनुमाना विषयी काय बोललं होतं. अजिंठ्याच्या डोंगरात कुणाला लपवून ठेवलं होतं? असा प्रश्न उपस्थित करत प्रतिक्रिया दिलीय.

आणखी वाचा