नाशिक : नाशिकमध्ये पार्किंगच्या वादातून एका भाजीविक्रेत्याची हत्या करण्यात आली आहे. नाशिकमधील अरिंगळे मळा परिसरातील ही घटना आहे. नरसिंह शिंदे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. यामध्ये नरसिंह यांच्या मुलावरही हल्ला करण्यात आला असून तोदेखील गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.


नाशिकरोडवरील वीर सावरकर उड्डानपुलाखालील भाजी बाजारात भाजीविक्रेते नरसिंह शिदे यांचं हातगाडी लावण्यावरून काही जणांसोबत बाद झाला होता. या वादाचा राग मनात ठेऊन काल संध्याकाळी एका टोळक्यांनं त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या चाकून वार केले.


हल्लेखोरींना नरसिंह यांच्या पोटात चाकू खुपसल्यानं ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या बचावासाठी आलेला त्यांचा मुलगा संदीपही या हल्ल्यात जखमी झाला आहे. दोघांनी जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत. मात्र नरसिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


पोलिसांनी वेगानं घटनेचा तपास करुन फरार आरोपी दीपक पाडळे, आकाश पाडळे, अमोल पाडळे आणि सुरेश सोनवणे यांच्या मुसक्या आवळल्या. या सर्वांवर नाशिकरोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.