नाशिकच्या नऊ गावांमध्ये लागू केलेली संचारबंदी अखेर मागे
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 16 Oct 2016 10:29 AM (IST)

नाशिक : नाशिकच्या 9 गावांमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी अखेर मागे घेण्यात आली आहे. तळेगावमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली होती. नाशिक, त्र्यंबक आणि इगतपुरी तालुक्यात उमटले तळेगावाती घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर 9 गावांमध्ये बुधवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली होती. तणावपूर्ण परिस्थितीमुळे सुरुवातीला 48 तास सांगण्यात आलेला संचारबंदीचा कालावधी वाढवण्यात आला होता. नऊ गावांपैकी विल्होळी गावातील संचारबंदी शुक्रवारी आणि शेवगेडांग गावातील संचारबंदी शनिवारी उठवण्यात आली. त्यानंतर उर्वरित 7 गावांची संचारबंदी आज सकाळी 6 वाजल्यापासून उठवली.