25 नोव्हेंबर रोजीच उत्तर, मध्य आणि दक्षिण भारतात एकत्र अभियान सुरु केलं जाईल. पुढची रॅली थेट दिल्लीत आयोजित केली जाणार आहे. ऋतुंबरा आणि 4 शंकराचार्य ही उपस्थित राहतील. या हुंकार सभेत मागणी एकच केली जाणार आहे, की केंद्र शासनाने कोर्टाची वाट न पाहता अध्यादेश काढून किंवा कायदा करुन मंदिर निर्माण सुरू करावे. ही मागणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी पहिल्यांदा विजयादशमीच्या कार्यक्रमात मांडली होती, मात्र त्यानंतर ज्या झपाट्याने संघ परिवार कामाला लागला आहे. यावरुन एक संपूर्ण ब्लू प्रिंट तयार केल्यावरच भागवत हे बोलले हे स्पष्ट आहे.
आज शनिवारी तयारीसाठी संघाच्या रेशीमबाग हॉलमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीला संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच भाजपचे नेतेही उपस्थित होते.