रविवारी सकाळी मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर पुन्हा पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सध्या राज्यभरात ठिकठिकाणी पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रात तर जोर कायम आहे.
सततच्या पावसामुळे वातावरणात गारवा आला आहे. मुंबईकरांसाठी हा दिलासा आहे.