मुंबई : मुंबईतील दहिसर पश्चिमेकडील विठ्ठल मंदिराजवळ एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील विठ्ठल चौकात बांधलेल्या वारकऱ्यांच्या पुतळ्याची दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री तोडफोड करण्यात आली होती. यामुळे सर्वत्र निषेध व्यक्त होत होता. या घटनेनंतर परिसरातील अनेकांना प्रश्न पडला होता की, कुणी असं का केलं असेल किंवा तोडफोड करणाऱ्यांनी हे करुन काय साध्य केलं. या घटनेबद्दल चिंता व्यक्त होत असताना अखेर पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.


बार्शीत महिलेची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या, मुलानेच हत्या केल्याचा संशय, तपासासाठी पथक रवाना


या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं आरोपींना पकडले गेले. या सीसीटीव्हीमध्ये एका स्कुटीवरुन आलेले तिघांपैकी दोघेजण खाली उतरुन या शिल्पाची विटंबना करताना दिसत आहेत. हे शिल्प उभारण्यात आलं आहे त्या चौकात स्कुटी ही स्कूटी थांबल्याचं दिसत आहे.  त्यानंतर मागील बाजूस बसलेली व्यक्ती स्कुटीवरुन उतरते. या व्यक्तीसोबत असणारे इतर दोघेजण शिल्पाची विटंबना करताना दिसतात. यामध्ये एकजण शिल्पामधील वारकऱ्याची मुर्ती पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.



या घटनेची माहिती मिळताच एमएचबी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान यातील आरोपी मुंबईतून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सीसीटीव्ही व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी याप्रकरणी आरोपी विघ्नेश हेगडे (30), अमर चित्तोरिया (25),  संजय गारू (30) यांना बोरीवली येथून अटक केली. दरम्यान आरोपींनी नशेच्या अवस्थेत असतांना शिल्प तोडल्याची माहिती दिली. सदर तिन्ही आरोपी दहिसरचे रहिवासी आहेत. या आरोपींपैकी अमर चित्तोरिया याच्याविरुद्ध यापूर्वी देखील 2 गुन्हे दाखल आहेत. एमएचबी पोलिसांनी या तीन आरोपींना 48  तासांच्या आत अटक केली आहे.