मुंबई : निधीचं गाऱ्हाणं घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘वर्षा’ बंगल्यावर गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आणि नगरसेवकांच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या.


कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्तही यावेळी उपस्थित होते.

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांच्या मतदारसंघातील विकास कामं होतं नाहीत. त्याचबरोबर नगरसेवकांना विकास निधी दिला जात नाही, अशी तक्रार होती. त्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची चर्चा केली.