यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी देसाई यांच्या यांचं चरित्रही प्रकाशित करण्यात आलं.
यावेळी सुभाष देसाई म्हणाले की, शिवसेनेनं सगळं काही दिलं. आता ही मंत्रिपदाची झूलही उतरवावी. गाडीवरील लाल दिवा काढून घेतल्यामुळे आता मंत्री राहण्यात काय अर्थ आहे? असं सांगत मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख यांनी सामना दैनिकावरुन एकमेकाला चिमटे काढले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात, सुभाष देसाई यांनीही सामनामध्ये रोखठोक लिहलं पाहिजे अशी भावना व्यक्त केली.