उद्धव ठाकरे म्हणाले की, "गेले काही दिवस युती हा विषय गाजताय. लोकसभा निवडणुकीआधी आम्हा तिघांमध्ये युतीचा फॉर्म्युला ठरला होता. यावेळी वेगळी पद्धत अवलंबली आहे. दोन दिवसात सगळं काही समजेल."
पाच वर्षात सरकारला दगा दिला नाही : उद्धव ठाकरे
भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमातील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात बहुमत नसतानाही स्थिर सरकार चालवून दाखवलं, असं विधान नरेंद्र मोदींन केलं होतं. याविषयी उद्धव ठाकरे म्हणाले की, "बहुमताचं सरकार नव्हतं, पण आम्ही पाच वर्षात सरकारला कधीच दगा दिला नाही. राजीनामे कुठं गेले, असा विचारलं जातं होतं, तेवढं सोडलं तर शिवसेना सरकारसोबत आहे."