उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपद दिल्यानं सामाजिक ऐक्य धोक्यात आल्याचं पवार म्हणाले. सध्या विरोधी पक्षात असल्यानं कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला काम करण्यासाठी मोठा वाव आहे, त्यासाठी एकत्र येऊन लढण्याचं आवाहन पवारांनी यावेळी केलं.
या मेळाव्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी पालकमंत्री गणेश नाईक, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.