मुंबई : कॅशलेस सिस्टममुळे दैनंदिन खर्चावर नियंत्रण आलं. तसेच यामुळे सर्वसामान्यांची लूट थांबली, असं म्हणत कॅशलेस व्यवहारांमुळे व्यवहार स्वच्छ आणि पारदर्शक झाले, असा टोला शरद पवार यांनी लगावला.


मुंबईत यशवंतराव चव्हाण यांची 104 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अनिल काकोडकर, आमदार हेमंत टकले आणि शरद काळे आदी मान्यवर उपस्थीत होते.

कॅशलेस सिस्टमचं कौतुक करताना शरद पवार पुढे म्हणाले की, ''पत्नी म्हणते पैसे कशाला हवेत? कार्ड घेऊन जा! पण खिशात काही नसलं कि चैन पडत नाही. गावाकडे कुठं कार्ड दाखवणार? पण हळूहळू एकही क्षेत्र असं राहणार नाही, ज्यातून कॅशलेस व्यवहार होणार नाहीत.''

या कार्यक्रमावेळी यंदाचा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 2016  नंदन निलेकणी यांना शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.