Raj Thackeray Mumbai Sabha Live: मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे यांनी आज  गोरेगावमधील नेस्को सभागृहात कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. कालपरवापर्यंत मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले तब्येतीचं कारण सांगून घरात बसले. एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री कांडी फिरवली अन् आता हे सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणारा मी नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घेणारा मी नाही. मी यांच्यासारखा नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का? कधी भूमिका घेतलीच नाही. पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, मला सत्तेत बसवा अशी भूमिका घेतली. फक्त पैशासाठी आणि सत्तेसाठी याच्यासोबत त्याच्यासोबत गेले, असं राज ठाकरेंनी म्हटलं...


राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे



  1. नेस्को सभागृहात मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते जमा झाले होते. यावेळी राहुल गांधी यांच्या सभेत काळे झेंडे फडकवणाऱ्या चौघांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

  2. गटाध्यक्ष म्हणजे लोकांशी संपर्क साधणारा राज ठाकरे असतो. आपल्या भूमिका लोकांपर्यंत नीट जाणं गरजेचं आहे. ही भूमिका पोहोचवणारे कोण आहेत तर गटाध्यक्ष. आपली भूमिका आणि आंदोलनं काय आहेत हे सांगण्यासाठी आपण एक पुस्तिका काढणार आहोत.

  3. फेब्रुवारी मार्चमध्ये निवडणुका होण्याची चिन्हं आहेत. वातावरणात निवडणुका दिसत नाहीत. राज्यात सध्या सर्व बाजूने खोळंबा झाला आहे. या गटाला मान्यता मिळणार की नाही मिळणार यांना चिन्ह मिळणार की नाही मिळणार. त्यांना त्यांची डोकी खाजवू द्या आपण आपलं काम करू.

  4. मनसेच्या आंदोलनाला सर्वाधिक यश मिळतंय. इतर पक्षांपेक्षा मनसेच्या आंदोलनाला यश मिळालं. लोकांच्या विस्मरणात ही आंदोलनात कशी जातील यासाठी काही यंत्रणा काम करतात. 

  5. टोलनाक्याच्या आंदोलनानंतर 65 ते 67 टोलनाके बंद झाले. आंदोलन यशस्वी झालं. ज्यांनी निवडणुकांच्या तोंडावर टोल बंद करण्याची केवळ घोषणा केली त्यांना प्रश्न विचारले जात नाहीत, आम्हाला प्रश्न विचारले जातात. मनसेच्या आंदोलनांची पुस्तिका काढणार

  6. कालपरवापर्यंत मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले तब्येतीचं कारण सांगून घरात बसले. एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री कांडी फिरवली अन् आता हे सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणारा मी नाही. 

  7. स्वत:च्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घेणारा मी नाही. मी यांच्यासारखा नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का? कधी भूमिका घेतलीच नाही. पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, मला सत्तेत बसवा अशी भूमिका घेतली. फक्त पैशासाठी आणि सत्तेसाठी याच्यासोबत त्याच्यासोबत गेले.

  8. आता म्हणतात राज ठाकरे हिंदुत्ववादी झाले. अहो मी हिंदुत्ववादी होतो आणि कट्टर मराठी कुटुंबात माझा जन्म झाला. पाकिस्तानी कलाकार जेव्हा धुडगूस घालत होते तेव्हा कुठे गेले होते हिंदुत्ववादी. 

  9. बाळासाहेब जी भूमिका बोलत होते भोंगे उतरले पाहिजे ती इच्छा आपण पूर्ण केली. आपण भोंगे काढा असे नाही म्हणालो, नाही काढले, तर हनुमान चालीसा लावू असे सांगितले.  पण अजून काही ठिकाणी चरबी जिरलेली नाही.  जिथे जिथे हे सुरु असेल तर पोलिसांना तक्रार दाखल करा. तरी झालं नाही तर मोठ्या ट्रकमध्ये स्पीकर लावून हनुमान चालीसा लावा.


  10. महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर जात आहेत. नरेंद्र मोदी यांनी पहिली पाच वर्षे उत्तर प्रदेश बिहार आणि उत्तराखंडकडे लक्ष द्यावे. त्या राज्यांमधील लोकं घरदार सोडून दुसऱ्या राज्यात जातात, त्यावेळी दुसऱ्या राज्यांना त्याचा त्रास होते. आज दोन प्रकल्प जातात याचे वाईट एका गोष्टीचे वाटतं. कुठल्याही राज्यात प्रोजेक्ट केले त्याचं वाईट नाही वाटतं. सर्व राज्यांची प्रगती झाली तर देश प्रगत होतो. नरेंद्र मोदी तुम्ही गुजरात गुजरात करू नका, प्रत्येक राज्य तुमचं अपत्य आहे, त्या प्रत्येक राज्याकडे समान पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे.  ही आपली धारणा होती, आहे आणि राहिल