प्रवाशांनी बराच वेळ अंधेरी लोकल अडवून धरली होती. अखेर बराच वेळानंतर संतप्त प्रवाशांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. यामुळे सध्या पश्चिम मार्गावरच्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. दरम्यान, हा नेमका प्रकार कशामुळे घडला याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही.
मात्र, या सर्व प्रकारानं प्रवाशांना बराच त्रास सहन करावा लागत आहेत. त्यामुळेच मोटरमन आणि स्टेशन मास्टरवर कारवाई करणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.