अण्णा हजारे यांची साक्ष या खटल्यात महत्त्वपूर्ण असून यातून काहीतरी नवी माहिती मिळू शकते, असा दावा त्यांनी या याचिकेत केला होता. यावर सुनावणी करताना न्यायमूर्तीं मृदुला भाटकर यांनी याप्रकरणात अण्णांचा नोंदवण्याची गरज नसल्याचं म्हटलं. या प्रकरणाशी अण्णा हजारेंचा थेट संबंध असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे त्यांचा या संपूर्ण प्रकरणाशी कोणताही संबंध असल्याचं सिद्ध होत नसल्याचं हायकोर्टाने या निकालात म्हटलं होतं.
राजकीय वैमानस्यातून काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांची 2006 साली नवी मुंबईतील कळंबोली येथे हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या सह सात जणांना अटक केली होती. मात्र पद्मसिंह पाटील हे सध्या जामीनावर बाहेर असून या प्रकरणी सत्र न्यायालयात हा खटलाही अद्याप सुरु आहे. या हत्येमागे नेमके प्रमुख कारण काय असू शकते याचा उलगडा अण्णा हजारे करु शकतात असा दावा सीबीआयनेही केला होता.