दिव्यांगांना देण्यात येणारी पेन्शन, व्यवसायासाठी दुकान, विनाअट घरकूल, संजय गांधी योजनेअंतर्गत मानधन वाढवणं, दिव्यांगांची कर्जमाफी करणं, स्पर्धा परीक्षेच्या वयोमर्यादेत वाढ, या मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात येतं आहे.
मात्र त्याआधीच पोलिसांनी समर्थकांना रोखल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. आज पोलीस आम्हला अडवत आहेत, म्हणून आम्ही इथे गांधीगिरीने आंदोलन करत आहोत, नाहीतर आम्ही मंत्रालयात घुसू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.