
घोटाळेबाजांना पालिका पुन्हा पुन्हा कामं देतेच कशी, असा प्रश्न विचारत हायकोर्टाने यावेळी पालिकेची चांगलीच खरडपट्टी काढली. ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडीलकर यांच्या जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान कोर्टाने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदारांना मुंबई महापालिकेने पुन्हा काम दिल्याचं समोर आलं होतं. स्थायी समितीने प्रस्ताव सादर करुन त्याला शिवसेना-भाजपने मंजुरीही दिली होती.