मानखुर्दमधील मंडाळा झोपडपट्टीतील आग 12 तासांनी नियंत्रणात
एबीपी माझा वेब टीम | 13 Jan 2017 07:36 AM (IST)
मुंबई : मानखुर्दमधील मंडाळा झोपडपट्टीला लागलेली आग अखेर आटोक्यात आली आहे. तब्बल 12 तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाचे अधिकारी आणि एनडीआरएफचे जवान यांना यश आलं आहे. या आगीत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव झोपडपट्टीतील रहिवाशांना शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे. केमिकल साठ्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.