Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 486 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.


मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शनिवारी 284 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,04,833 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 658 झाली आहे. सध्या मुंबईत 2,591 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 486 रुग्णांमध्ये 449 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 2329 दिवसांवर गेला आहे.






सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत


राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 2591 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 3036 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 934 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 170, रायगड 233, रत्नागिरी 53, सिंधुदुर्ग 56, सातारा 100, सांगली 195, कोल्हापूर 149, सोलापूर 166, नाशिक 485, अहमदनगर 339, जळगाव 51, धुळे 69, औरंगाबाद 201, जालना 54, बीड 62, लातूर 208, परभणी 28, हिंगोली 34, नांदेड 93, उस्मानाबाद 162, अमरावती 124, अकोला 38, वाशिम 118, बुलढाणा 54, यवतमाळ 118, नागपूर 1228, वर्धा 82, भंडारा 293, गोंदिया 132, गडचिरोली 90 आणि चंद्रपूरमध्ये 127 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 11875 सक्रिय रुग्ण आहेत.


राज्यात 1931 कोरोना रुग्णांची नोंद


राज्यात आज 1931 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1953 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे  मुंबई जिल्ह्यातील आहे. 


संबंधित बातम्या


Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 1931 कोरोना रुग्णांची नोंद तर BA.5 आणि BA 2.75 व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत देखील वाढ


Maharashtra Corona : महाराष्ट्रात कोरोना वाढतोय, उपाययोजना करा; केंद्राचं राज्याचा आरोग्य सचिवांना पत्र