Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 322 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.


मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी 236 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,03,261 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 651 झाली आहे. सध्या मुंबईत 1,901 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 322 रुग्णांमध्ये 298 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 3049 दिवसांवर गेला आहे.






सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत


राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 1901 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 3855 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 775 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 167, रायगड 290, रत्नागिरी 75, सिंधुदुर्ग 72, सातारा 218, सांगली 216, कोल्हापूर 149, सोलापूर 202, नाशिक 602, अहमदनगर 440, जळगाव 52, धुळे 117, औरंगाबाद 260, जालना 118, बीड 55, लातूर 205, परभणी 33, हिंगोली 37, नांदेड 75, उस्मानाबाद 203, अमरावती 160, अकोला 60, वाशिम 183, बुलढाणा 93, यवतमाळ 104, नागपूर 1548, वर्धा 99, भंडारा 324, गोंदिया 78, गडचिरोली 62 आणि चंद्रपूरमध्ये 132 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 13003 सक्रिय रुग्ण आहेत.


राज्यात 1849 कोरोना रुग्णांची नोंद


राज्यात आज 1849 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1853 रुग्ण बरे होऊन आज घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत कोरोनातून बऱ्या होणाऱ्यांची संख्या 78,86,348 वर पोहोचली आहे. 


संबंधित बातम्या


Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात रविवारी 1849 कोरोना रूग्णांची नोंद, तीन बाधितांचा मृत्यू 


Covid-19 : दिलासादायक! देशातील कोरोनाबाधितांची संख्या घटली, 39 रुग्णांचा मृत्यू; धोका कायम