'बेस्ट'चा संप उद्धव ठाकरे यांच्या संगनमताने, काँग्रेसचा आरोप
एबीपी माझा वेब टीम | 14 Aug 2017 11:16 PM (IST)
शिवसेनेचे बेस्ट समिती सदस्य सुहास सामंत यांनी 'बेस्टच्या कर्मचाऱ्यांना एकदिवसीय संप करण्यासाठी उद्धव ठाकरेंनीच मान्यता दिली. तसंच एका दिवसानंतर संप मागे घेण्यासही सांगितलं' असं विधान केल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.
फाईल फोटो
मुंबई : 'बेस्ट'चा संप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संगनमतानं झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. शिवसेना सदस्यांनी केलेल्या विधानानंतर काँग्रेसने हा सवाल उपस्थित केला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप 16 तासांनी उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर मागे घेण्यात आला. बेस्ट समितीच्या सभेत बेस्टचा अर्थसंकल्प हा मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याच्या मुद्द्यावर चर्चा सुरु होती. यावेळी शिवसेनेचे बेस्ट समिती सदस्य सुहास सामंत यांनी 'बेस्टच्या कर्मचाऱ्यांना एकदिवसीय संप करण्यासाठी उद्धव ठाकरेंनीच मान्यता दिली. तसंच एका दिवसानंतर संप मागे घेण्यासही सांगितलं' असं विधान केल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.