मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात एकीकडे विरोधकांकडून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात येत असतानाचं दुसरीकडे मनसेने मात्र आदित्य यांची बाजू घेतली आहे. ठाकरे परिवाराच्या एखाद्या सदस्याकडून अशी काही गोष्ट झाली असेल असं मला वाटतं नाही. अशी प्रतिक्रिया मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. बाळा नांदगावकर आज बेस्ट बील दरवाढी विरोधात शिष्टमंडळासह बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांची भेट घेण्यासाठी कुलाबा येथील बेस्ट भवन येथे आले होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.


यावेळी बाळा नांदगावकर आणि बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्यात तब्बल 2 तास चर्चा झाली. याबाबत बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की बेस्ट प्रशासनाने नागरिकांना भरमसाठ वीज बिलं पाठवून जो शॉक दिलाय. त्याबाबत लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या अनोख्या पद्दतीने बेस्ट प्रशासनाला शॉक दिल्याशिवाय राहणार नाही. याला पूर्णपणे बेस्ट प्रशासन जबाबदार असेल. दरम्यान वाशी आणि शिरूर येथे दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जी वितरण विभागाच्या कार्यालयांची तोडफोड केली होती. त्या खळखट्याक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुलाबा ऑफीस समोर पोलीस प्रशासनाने मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पोलिस प्रशासनकडून बेस्ट भवनच्या बाहेर दोन पोलीस व्हॅन, जलद कृती दलाची गाडी आणून उभी केली होती. यासोबतच बेस्ट भवनच्या प्रत्येक गेटवर पोलिसांची फौज उभी केली होती. यामुळे काही काळ याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


माझ्या चितेला अग्नी देणारा हिरावून घेतला; सुशांतच्या वडिलांचं सुप्रीम कोर्टात उत्तर


यावेळी बाळा नांदगावकर यांना मागील काही दिवसांपासून मुंबईतील बेस्ट प्रशासनाचे 89 पैकी केवळ 11 वीज बील भरणा केंद्र सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होतं असल्या बाबतचा प्रश्न विचारला असता बाळा नांदगावकर म्हणाले की याबाबत बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्याशी चर्चा झाली आहे. लवकरच इतर वीज भरणा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचं आश्वासन बागडे यांनी दिलं असल्याचं नांदगावकर म्हणाले.


शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. त्यांच वक्तव्य अपरिपक्व आहे. या शरद पवार यांच्या वक्तव्यबाबत बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, त्यांचा तो कौटुंबिक प्रश्न आहे. त्यांचे ते सोडवतील. यासोबतच आदित्य ठाकरे यांचे सुशांतसिंह राजपूत प्रकरणात वारंवार नाव येत असल्याच्या प्रकरणात बोलताना नांदगावकर म्हणाले की, ठाकरे कुटुंबातील व्यक्ती असं काही करेल असं वाटतं नाही. यासोबतच सीबीआय चौकशी बाबत मागणी होतेय. ती व्हावी.


Sanjay Raut PC | शरद पवार यांचं कोणतंही वक्तव्य निरर्थक नसतं : संजय राऊत