मुंबई : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्रासाठी (Hospitality and Tourism) कहर ठरत आहे. मुंबईतील हयात रिजेन्सी (Hyatt Regency) हॉटेलने "निधीचा तुटवडा असल्याने हॉटेलचं कामकाज बंद करण्यात आलं या आशयाचे पत्र काढले होते. यानंतर हयात रिजन्सीच्या व्यवस्थापनाविरोधात भारतीय कामगार सेनेच्या तक्रारीची लेबर कमिशनकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.  

सहायक कामगार आयुक्तांनी कामगार हयात रिजन्सीला नोटीस पाठवण्याच आली आहे. उद्या दुपारी 1 वाजता हयात रिजेसीच्या व्यवस्थापनाला कामगार आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे. हॉटेल बंद झाल्यानंतर कामगारांच्या थकीत वेतनाबाबत तक्रार केली होती. 

नेमकं काय म्हटलं होत हॉटेल प्रशासनाने परिपत्रकात?

हयात रिजेन्सीने या पत्रकात म्हटलं होते की, "हयात रिजेन्सी मुंबई चालवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी हॉटेलचे मालक असलेल्या एशियन हॉटेल्स वेस्ट लिमिटेडकडून कोणताही निधी येत नसल्याची माहिती हॉटेलच्या सर्व ऑन-रोल स्टाफला दिली आहे. त्यामुळे हॉटेलचं सर्व कामकाज तात्पुरत्या स्वरुपात तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हॉस्पिटॅलिटी सेक्टरवर सर्वात परिणाम

हॉटेल आता पुढील आदेशापर्यंत बंद राहिल. मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे टुरिझम आणि ट्रॅव्हलशी संबंधित आदरातिथ्य  क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. शिवाय या क्षेत्राला सरकारकडून कोणत्याही प्रकारचं पॅकेज मिळालेलं नाही.

कोरोना संकटात नागरिकांनी केवळ गरजेपुरताच प्रवास केला आहे. आता जरी रेस्टॉरंटसह इतर गोष्टींचं कामकाज सुरु झालं तर कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. अनेक महिने हॉटेल तसंच रेस्टॉरंट बंद होते, ग्राहक-पाहुणे आलेले नाहीत. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना पगार कसा आणि कधीपर्यंत द्यावा, असा प्रश्न कंपन्यांसमोर उभा आहे. इतकंच नाही एखाद्या पाहुण्यासाठी या हॉटेलचा दररोजचा खर्चही मोठा असतो. परिणामी पैशांअभावी हॉटेल हयात रिजेन्सी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संबंधित बातम्या :

मुंबईच्या Hyatt Regency हॉटेलकडे कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी पैसे नाहीत, कामकाज बंद