मुंबई : पालघर हत्याकांडाचा संपूर्ण तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. घटना झाल्यानंतर आठ तासात 101 जणांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या घटनेला जातीय रंग देणं दुर्दैवी असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. देशमुख यांनी आज फेसबुक लाईव्ह द्वारे संवाद साधला. ते म्हणाले की, घटनेनंतर गुन्हेगार बाजूच्या जंगलात पळून गेले होते. तिथून त्यांना ताब्यात घेतलं. त्या 101 जणांची यादी आज जाहीर करणार आहे अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.


यावेळी देशमुख यांनी सांगितलं की, पालघरच्या घटनेत एकही मुस्लीम नव्हता. ही घटना घडत असताना काही जण 'ओये बस', 'ओये बस' असं म्हणत होते. त्या ऐवजी शोएब असं बोललं जात असल्याचा गैरसमज पसरवण्यात आला. या घटनेला जातीय रंग देण्यात आला. ही दुर्दैवी गोष्ट आहे. आज संपूर्ण यंत्रणा कोरोनाशी लढत असताना त्यात जातीचं राजकारण आणण्याचा प्रयत्न केला गेला. आज ती वेळ नाही. एकत्र येऊन काम करण्याची वेळ आहे, असं ते म्हणाले.

पालघर हत्याकांड | चार ड्रोनच्या माध्यमातून जंगलात फरार झालेल्या आरोपींचा शोध

यावेळी अनिल देशमुख यांनी सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंतीही केली. सर्वांनी एकत्रितपणे कोरोनाचा सामना करण्याची गरज असताना काही लोक मुंगेरीलाल के हसीन सपने बघत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.

पालघर प्रकरणातील आरोपींची नावं








पालघरमध्ये घडलेल्या हत्याकांडाचा तपास आता सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणातील 200 ते 300 आरोपी अजूनही जंगलात फरार आहेत. या ठिकाणी जंगल घनदाट असल्याने शोध मोठं आव्हान यंत्रणेसमोर आहे. त्यामुळे आरोपींचा शोध घेण्यासाठी आता चार ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. पालघरच्या डहाणू तालक्यात कासा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गडचिंचले गावात दोन साधू आणि वाहनचालकाची चोर असल्याच्या गैरसमजातून गावकऱ्यांनी हत्या केली होती. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध आता ड्रोनच्या मदतीने घेतला जाणार आहे.