मुंबई : मुंबईतील एचडीएफसी बँकेचा असंवेदनशीलपणा समोर आला आहे. फोर्ट शाखेबाहेर कुणी रात्रीचे झोपू नये म्हणून अणुकुचिदार खिळ्यांची जाळी बसवण्यात आली होती. मात्र सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्यनंतर आणि एबीपी माझाने यासंदर्भात बातमी दाखवल्यानंतर ती जाळी अखेर काढून टाकण्यात आली आहे.


नेमकं काय प्रकरण आहे?

एचडीएफसी बँकेच्या शाखेने रात्री बँकेबाहेर कुणी बसू नये, झोपू नये म्हणून अनुकुचिदार टोक असणाऱ्या खिळ्यांची जाळी बसवली होती. मुंबईतील फोर्ट भागात एचडीएफसी बँकेची ही शाखा आहे. बँकेच्या या असंवेदनशीलपणावर सोशल मीडियावर जोरदार टीका सुरु झाली.

अखेर एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर बँकेने ही अणुकुचिदार टोक असणारी जाळी काढून टाकली. या जाळीमुळे कुणाचा जीवही जाऊ शकत होता, इतकी भयानक जाळी होती.

पाहा व्हिडीओ :