मागील वर्षी लग्नाचे आमिष दाखवून संबंधित तरुणाने बलात्कार केल्याचा पीडितेचा आरोप होता. त्यामुळे सदर महिलेने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी सदर तरुणाविरोधात भा.दं.वि. कलम 376 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तरुणाची त्याच्या घरच्यांनी समजूत काढली आणि त्यानंतर या दोघांनी 19 जानेवारी 2019 रोजी स्पेशल मॅरेज अॅक्टखाली विवाह केला. त्यानंतर तरुणाने आपल्यावरील गुन्हा रद्द व्हावा यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यात पीडित महिलेचे हित विचारात घेऊन हायकोर्टाने गुन्हा रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.