मुंबई : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सीएसएमटीएम पुलाच्या बाह्य रुपाकडं लक्ष दिलं गेलं मात्र पुलाच्या मजबुतीकडे मात्र लक्ष दिलं गेलं नाही. 2016 मध्ये दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत रंगरंगोटी, नव्या फरश्या बसवणे, नवे दिवे लावणे अशी कामं हाती घेण्यात आली. यावेळी आता कोसळलेल्या सीएसएमटी पुलालाही नव्यानं रंगरंगोटी करण्यात आली. तसंच फरश्याही नव्या बसवण्यात आल्या. या नव्या फरश्यांनीच पुलावरचा भार वाढला का आणि पूल कोसळला का अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या सुशोभिकरणानंतर झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल चांगल्या स्थितीत असल्याचं सांगितलं गेलं.
दरम्यान, सीएसएमटीवरील पादचारी पूल कोसळल्यानंतर पादचाऱ्यांच्या समस्या काही संपताना दिसत नाही. जीव धोक्यात घालून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी डिव्हाईडरवरुन उड्या माराव्या लागत आहे. सीएसएमटी स्टेशनला जोडणारा पूल कोसळल्यानंतर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणं मुश्कील झालं आहे. सीएसएमटी स्टेशनवरुन महापालिका मार्गाकडे आणि क्रॉफर्ड मार्केटकडे भर ट्रॅफीकमध्ये सर्वसामान्य पादचाऱ्यांना रस्ता ओलांडावा लागतो आहे. पूल तुटल्याने मुंबईकरांना सीएसएमटी सबवेचा एकच पर्याय उरतो, मात्र त्यासाठी बराच लांबचा पल्ला पार करावा लागतो. त्यामुळे जीव धोक्यात घालून पादचारी डिव्हायडरवरुन उडी मारण्याला पसंती देत आहेत.संबंधित बातम्या
पूल कोणाचा? रेल्वे प्रशासनाची आणि पालिकेची एकमेकांवर टोलवाटोलवी
सीएसएमटीजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, पाहा घटनास्थळाची छायाचित्रे
बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी लोकांच्या जीवाची पर्वा करावी, धनंजय मुंडेंची टीका
पुलाचे ऑडिट झाले नाही, या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार : स्थानिक नगरसेविकेचा आरोप
'तो' पूल 100 टक्के धोकादायक नव्हता, दुर्घटनेची चौकशी केली जाईल : विनोद तावडे
रेड सिग्नलमुळे अनेक जीव वाचले, सिग्नल असल्याने वाहतूक थांबली, मोठी जीवितहानी टळली