सम एका कुटुंबात एक याप्रमाणे कुर्बानीसाठी परवाने देण्यात आले आहेत. तसंच कुर्बानी देताना सोसायटीची परवानगी, कुर्बानीची जागा ही चारही बाजूने बंद असणंही आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर या दोन्ही दिवशी दिवसभर कुर्बानीचे अवशेष उचलण्यासाठी महापालिकेतर्फे वॉर्डनुसार कचरा उचलणाऱ्या गाड्या दिवसभर फिरतीवर असणार आहेत. जेणेकरुन प्राण्यांच्या अवशेषांमुळे इतर समस्या निर्माण होणार नाहीत, असंही पालिकेतर्फे हायकोर्टात सांगण्यात आलं आहे.
बकरी ईदनिमित्ताने दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन परवान्यांना 'जीव मैत्री ट्रस्ट'तर्फे हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. महापालिकेने दिलेल्या या उत्तरावर समाधान व्यक्त करत हायकोर्टाने पालिकेला ऑनलाईन परवान्यांकरता हिरवा कंदील दिला असून आठ आठवड्यांनंतर होणाऱ्या सुनावणीत पालिकेला कबूल केल्याप्रमाणे नियम पाळल्याचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.