मुंबईत वरळीजवळ समुद्रात बोट बुडाली, सात पैकी सहा जणांना वाचवण्यात यश
एबीपी माझा वेब टीम | 18 Mar 2019 02:57 PM (IST)
रेवती नावाच्या या बोटीत एकूण सात जण प्रवास करत होते. कोस्टगार्डने रेस्क्यू ऑपरेशन करुन बोटीतील सात पैकी सहा जणांना वाचववं आहे.
मुंबई : वरळीजवळ समुद्रात बोट बुडाल्याची घटना समोर आली आहे. या बोटीतील एकजण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. कोस्टगार्डला रेस्क्यू ऑपरेशन करुन सहा जणांना वाचवण्यात यश आलं आहे. रेवती नावाच्या या बोटीत एकूण सात जण प्रवास करत होते. दोन कोस्टगार्ड शीप, एका हेलिकॉप्टरच्या साहाय्याने या सात जणांपैकी सहा जणांना कोस्टगार्डने वाचवलं आहे. मात्र एक जण अद्यापही बेपत्ता आहे.