- वांद्रे टर्मिनस ते बीकेसी रस्ता पूर्णत: ठप्प
- वांद्रे टर्मिनस परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी
- वांद्र्याहून दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक रखडली
- बीकेसीचा परिसर खचाखच, ट्रॅफिकमुळे मुंबईकरांना मनस्ताप
भाजपचा महामेळावा, मुंबईकरांना मनस्ताप, भाजपच्या बस रोखल्या
एबीपी माझा वेब टीम | 06 Apr 2018 10:05 AM (IST)
भाजपने मुंबईत महामेळाव्याचं आयोजन केलं आहे. मात्र या कार्यक्रमामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना मोठा मनस्ताप होत आहे.
मुंबई: स्थापना दिनानिमित्त भाजपने मुंबईत महामेळाव्याचं आयोजन केलं आहे. मात्र या कार्यक्रमामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना मोठा मनस्ताप होत आहे. पश्चिम द्रूतगती मार्गावर कालपासून मोठी वाहतूक कोंडी होत आहे. काल अमित शाहांच्या स्वागतासाठी भाजपने सांताक्रूझ विमानतळ ते बीकेसीपर्यंत बाईक रॅली काढली होती. मात्र यामुळे तब्बल 4 ते 5 तास वाहतूक रखडली होती. आजही भाजप कार्यकर्त्यांना घेऊन अनेक बसेस येत आहेत. मात्र यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत आहे. भाजपच्या बस रोखल्या भाजपच्या बाईक रॅलीमुळे काल मुंबईकरांना मोठा मनस्ताप झाला. आजही तोच प्रकार पाहायला मिळत असल्याने, मुंबईकरांचा आज उद्रेक पाहायला मिळाला. वांद्रे टर्मिनसहून बीकेसीकडे जाण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना बस मिळते. पण सामान्य मुंबईकरांना बस मिळत नाही. त्यामुळे संतापलेल्या मुंबईकरांनी बीकेसीकडे जाणारी भाजप कार्यकर्त्यांची बस अडवली. वाहतूक कोंडी