मनोज म्हात्रे हे भिवंडीतील अंजूरफाटा परिसरात राहत होते. काही कामानिमित्त ते आज त्यांच्या इमारती खाली आले होते. त्याचवेळी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाले असून सध्या पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीही मनोज म्हात्रेंवर भिवंडीमधील नारपोली भागात हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे त्यांची हत्या पूर्व वैमनस्यातून झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पोलीस याप्रकरणी कसून तपास करत असून मनोज म्हात्रे यांचा कुणाशी वाद झाला होता का? याचाही चौकशी करत आहेत.