= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या महाराष्ट्र द्वेषाला जाब विचारण्यासाठी राज्यभरातून दहा लाख पत्र पाठविण्यात येणार महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या महाराष्ट्र द्वेषाला जाब विचारण्यासाठी आणि त्यांना कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने 1 ऑगस्ट पासून दहा लाख पत्र राज्यभरातून पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी दिली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यपालांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ; पुण्यातील शिवसैनिकांचा हल्लाबोल Pune Shivsea: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आली आहे, असं म्हणत पुण्यातील शिसैनिकांनी आंदोलन केलं आहे. पुण्यातील गुडलक चौकात शिवसैनिकांनी एकत्र येत राज्यपालांविरोधात हल्लाबोल केला आहे. कोशारी मत करो होशारी असं लिहिलेले फलक हाती घेत शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
महाराष्ट्राच्या परंपरेचे भान असणारा व्यक्ती राज्यपाल म्हणून नेमावा : छत्रपती संभाजीराजेंची राष्ट्रपती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई बाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी आज ट्विट करीत एकप्रकारे भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटविण्याची व याठिकाणी महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याबद्दल आदर असणारा योग्य व्यक्ती नेमावा, असे म्हटले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यपालांवर केंद्र सरकारचं नियंत्रण असायला हवं - दीपक केसरकर राज्यपालांची भाषण लिहून देणा-या विभागात सुधारणा होण्याची गरज आहे. त्यांना जे लिहून दिलं जातं ते तेच वाचतात. राज्यपालांवर केंद्र सरकारचं नियंत्रण असायला हवं. मुख्यमंत्री सध्या दौ-यावर आहेत, ते आल्यावर त्यांची भेट घेतील, असे केसरकर म्हणाले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रायगड - आता रेल्वेत मिळणार हक्काची जागा दूर पल्ल्याच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षण आधी केले जाते..आरक्षण सीट कन्फर्म झाल्यानंतर उर्वरित उपलब्ध राहिलेल्या सीट कोणाला द्यायची यावर टीसीची मक्तेदारी चालायची.या मक्तेदारीला आळा बसण्यासाठी आता 'हॅण्ड हेल्ट टर्मिनल' ही प्रणाली अस्तित्वात आणली आहे.त्यामुळे टीसीची मक्तेदारी संपून प्रवाश्यांना आपली हक्काची जागा मिळणार आहे.रेल्वे प्रशासनाने प्रत्येक विभागाला 'एच एच टी' मशीन देण्यात आले आहेत..
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यपालांचे वक्तव्य हे महाराष्ट्र द्वेषापोटीचं, वैभव नाईक शिंदे आणि फडणवीस सरकारला आज एक महिना पूर्ण होतोय. मात्र गेल्या महिन्याभरात या सरकारकडून कोणत्याही प्रकारची विकास कामे झालेली नाहीत. सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत झालेली नाही. आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा दुसऱ्या टप्प्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून होत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शिवसैनिकांची सावंतवाडीत मोठी गर्दी झालेली आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी आशा आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली. दीपक केसरकर हे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर न बोललेलं असा टोमणा मारत वैभव नाईक यांनी दीपक केसरकरांवर बोलणं टाळलं. महाराष्ट्र द्वेषाचा राज्यपालांना संवाद होता, तो आता त्यांच्या पोटातून ओठावर येत आहे. गेल्या दोन अडीच वर्षात राज्यपालांनी महाराष्ट्राच्या द्वेषाची भूमिका कायम मांडली. राज्यपाल या पदाचा आम्हाला आदर आहे. मात्र जो भाजपचा अजेंडा आहे, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची. मात्र शिवसेनेचे कार्यकर्ते असेपर्यंत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या शेवटच्या रक्तातच महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करू देणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांनी तात्काळ जाहीर माफी मागावी : सतेज पाटील राज्यपाल हे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे पद असून वारंवार महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, क्रांतिकारक तसेच सर्वसामान्य मराठी माणसांचा वारंवार अपमान करत असून आम्ही त्यांचा तीव्र निषेध करत असल्याचे माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले असून लाखो मराठी माणसांच्या कर्तृत्वाने हे राज्य देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दिशा देण्याचे काम करत आले. देशाची 'आर्थिक राजधानी मुंबई' संदर्भात अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांनी तात्काळ जाहीर माफी मागावी. लाखो लोकांना आधार देणारी ही 'आपली मुंबई' असल्याचे ते म्हणाले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यपाल हे राज्यपाल नसून भाजपपाल आहेत; पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते आक्रमक Pune NCP: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं त्या वक्तव्यानंतर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. राज्यपाल हटाओ महाराष्ट्र बचाओ, अशा घोषणा देत आंदोलन करत आहेत. राज्यपाल हे राज्यपाल नसून भाजपपाल आहेत, असं विधानदेखील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यपाल महोदयांनी मांडलेला नवीन ‘सिद्धांत’ ऐकूण आश्चर्य वाटलं नाही- रोहित पवार आगामी महापालिका निवडणूक डोळ्यापुढं ठेवून मुंबईसंदर्भात काल राज्यपाल महोदयांनी मांडलेला नवीन ‘सिद्धांत’ ऐकूण आश्चर्य वाटलं नाही. कारण आजवर IFSC सेंटर, बुलेट ट्रेन, शिपयार्ड (ही लांबलचक यादी आहे) अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा वारंवार प्रयत्न झाला आहे.
आता तर मराठी अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय पण महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही. मुंबईचं आजचं स्थान हे सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांमुळे आहे. पण त्यात भेदभाव करुन मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करा, असं म्हणायलाही कदाचित भेदभाव करणारे कमी करणारा नाहीत.
वास्तविक सर्वांना सामावून घेण्याइतकं समुद्रासारखं विशाल मन मुंबई व महाराष्ट्राचं आहे.याचा गैरफायदा घेत समुद्राच्या काठावर राहणाऱ्या मोठ्या व्यक्तीकडून मराठी माणसाला कमी लेखण्याचा आणि भाषा व प्रांतवाद निर्माण करण्याचा होणारा प्रयत्न दुर्दैवी व महाराष्ट्राच्या भावना दुखावणारा आहे.
जबाबदार पदावरील व्यक्तीने वादग्रस्त वक्तव्ये करण्यापेक्षा विश्वासदर्शक ठरावासाठी तातडीने अधिवेशन बोलावण्याच्या निर्णयाप्रमाणे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जनतेला मदत करण्याबाबत सरकारला तातडीने पत्र पाठवण्याची आज खरी गरज आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यपाल यांना महामहीम म्हटले जाते, त्यांना आदर दिला जातो, पण आता त्यांना त्यांची लायकी दाखवायची वेळ आली आहे- जितेंद्र आव्हाड राज्यपाल यांना महामहीम म्हटले जाते, त्यांना आदर दिला जातो, पण आता त्यांना त्यांची लायकी दाखवायची वेळ आली आहे, आज त्यांनी मराठी माणसाचा नाही तर मराठी माणसाच्या अस्मितेचा अपमान केला आहे,
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये- आशिष शेलार कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये, असं भाजप आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
देशाच्या विकासात मराठी माणसांचा सहभाग सर्वाधिक- फडणवीस फडणवीस म्हणाले की, राज्यपालांच्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि वाटचालीमध्ये मराठी माणसांचं कार्य सर्वाधिक आहे. उद्योगाच्या क्षेत्रात देखील मराठी माणसाची प्रगती लक्षणीय आहे. त्यांचं जगभरात नाव आहे. वेगवेगळ्या समाजाचं योगदान नाकारता येत नाही पण महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी उद्योजक, मराठी साहित्यिक, मराठीतील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा सहभाग जास्त आहे. एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यावर अतिशयोक्ती अलंकार वापरला जातो तसा त्यांनी वापरला. त्यांच्या मनात मराठी माणसांबद्दल श्रद्धा आहे. त्यांना जाणिव आहे की, या देशाच्या विकासात मराठी माणसांचा सहभाग सर्वाधिक आहे, असंही फडणवीस म्हणाले. राज्यपाल काय बोलले याबाबत ते खुलासा करतील पण आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून शिवसेनेकडून सोलापुरात फलकबाजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून शिवसेनेकडून सोलापुरात फलकबाजी, सोलापुरातील साखर पेठ परिसरात ब्लॅक बोर्डावर लिखाण करत राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध, शिवसेना शहरउपप्रमुख बापू ढगे यांच्याकडून फलकबाजी
राज्यपाल भगतसिंह यांच्याबद्दल शिवराळ आणि अपमानजनक भाषा, लिहिलेल्या भाषेबद्दल जर मला शिक्षा झाली तरी हरकत नाही, मात्र मागच्या काही वर्षात राज्यपालांनी वापरलेली भाषा ही सहनशिलतेच्या पलीकडे जाणारी, शिवसेनेचे सोलापूर शहरउपप्रमुख बापू ढगे यांची प्रतिक्रिया
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाव कोश्यारी मात्र बोलताना होशियारी नाही, काँग्रेस नेते जयराम रमेश यांची टीका = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये- आशिष शेलार = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर. दुपारी 3 वाजता मुंबईतील हुतात्मा चौकात राष्ट्रवादीच्या वतीने राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येणार, मुंबई विभागीय राष्ट्रवादीच्या वतीने कार्याध्यक्ष राखी जाधव आणि नरेंद्र राणे उपस्थित राहणार
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जनतेचे मत पोस्टकार्डवर नोंदवून राज्यपालांना पाठवणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
उद्धव ठाकरे एक वाजता संवाद साधणार; राज्यपालांच्या वक्तव्यावर काय बोलणार? याकडे लक्ष उद्धव ठाकरे एक वाजता संवाद साधणार; राज्यपालांच्या वक्तव्यावर काय बोलणार? याकडे लक्ष
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यपालांचे हे बोलणे अप्रस्तुत, राज्यपाल निर्विवाद असावेत- छगन भुजबळ छगन भुजबळ म्हणाले की, आदरणीय राज्यपाल हे आमचे मित्र पण त्यांनी असे वक्तव्य करणे शक्यतो टाळावे, यामुळे वाद वाढतात. राज्यपालांनी नेहमी निर्विवाद राहावे. ब्रिटिश असेल किंवा सगळ्यांनाच मुंबई आवडली होती. मुंबईत सर्व प्रकारचे लोक आहेत, अदानींना पण मुंबई आवडते. मुंबईला असलेले बंदर, व्यापार, उद्योग, विमानतळ अनेक कलाकार मुंबईतील. गुजराती, राजस्थानी सगळे आमचेच आहेत . देशाचे मुख्य न्यायाधीशही महाराष्ट्राचे. त्यामुळे मुंबईचे महत्व कसे कमी करता येईल ? मुंबादेवीचा आशीर्वाद आहे मुंबईवर. राज्यपालांचे हे बोलणे अप्रस्तुत, राज्यपाल निर्विवाद असावे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Bhagat Singh Koshyari : राज्यपालांच्या वक्तव्यावर शिंदे गट नाराज, केंद्र सरकारला पत्र लिहिणार राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात विरोधक आक्रमक झाले असताना शिंदे गटाने राज्यपालांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्त दीपक केसरकर (Deepak Kesarkar)यांनी केली. राज्यपालांनी केलेले वक्तव्य हे राज्याचे अपमान करणारे आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले की, राज्यपाल घटनात्मक पद आहे. त्यामुळे कोश्यारी यांच्याकडून यापुढे अशी विधाने येणार नाही अशी सूचना केंद्राने द्यावी, असेही केसरकरने म्हटले. मुंबईच्या उभारणीत सगळ्याच समाजाचा वाटा आहे. मात्र, त्यातही मोठा वाटा मराठी माणसांचा आहे. मुंबईतील औद्योगिक उभारणीत मुंबईच्या उभारणीत पारशी समुदायाचे मोठं योगदान आहे.
एखाद्या समाजाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या समाजाने पैसा काढला की मुंबईत काही राहणार नाही असे वक्तव्य म्हणजे राज्यपालांचा मुंबईबाबतचा अभ्यास कमी आहे, याचे द्योतक असल्याचे केसरकर यांनी म्हटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दौऱ्यावरून मुंबईत आल्यानंतर सगळे आमदार त्यांना भेटणार आहोत. राज्याच्या भावना राज्यपालांनी जपल्या पाहिजेत. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर मराठी माणसाची भावना केंद्र सरकारला कळवावी यासाठी मुख्यमंत्र्यांना आग्रह धरणार असल्याचे केसरकर यांनी म्हटले.
https://marathi.abplive.com/news/mumbai/maharashtra-politics-eknath-shinde-group-unhappy-with-governor-bhagat-singh-koshyari-remark-on-mumbai-1084684
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही- नितेश राणेंकडून राज्यपालांची पाठराखण = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यपालांच्या विरोधात संजय राऊत आक्रमक = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यपालांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे- सचिन सावंत = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यपालांचं वक्तव्य हे महाराष्ट्रद्रोही वक्तव्य आहे- यशोमती ठाकूर राज्यपालांचं वक्तव्य हे महाराष्ट्रद्रोही वक्तव्य आहे असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.. सातत्याने महाराष्ट्र द्रोही वक्तव्य करणं राज्यपाल यांना शोभत नाही, असं म्हणत यशोमती ठाकूर यांच्या कडून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध.. राष्ट्रपती यांनी राज्यपाल यांना दुसरीकडे कुठेतरी हलवावे... जेणे करून महाराष्ट्राचं भलं होईल...
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी म्हटलं आहे की, ज्यांना असं वाटतं आर्थिक प्रगती हीच प्रगती आहे ही बौद्धिक दिवाळखोरी आहे. मराठी माणसाच्या त्यागामुळं मुंबई आणि महाराष्ट्र घडला आहे. मराठी माणसांमुळं इतरांचा फायदा झाला आहे. राज्यातील आधीच्या सरकारने जी धोरण आखली त्यामुळे मुंबई, महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे आले, म्हणून महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र प्रगत झालाय. महाराष्ट्राचा अपमान कदापी सहन करणार नाही. नको त्या ठिकाणी जे समजत नाही त्या बाबत त्यांनी बोलू, नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये, असं त्यांनी म्हटलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली आहे, असं मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी म्हटलं आहे. मागे सावित्रीमाई बद्दल आता मराठी, महाराष्ट्राबद्दल बेताल वक्तव्य केलं आहे. हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही. मराठी, महाराष्ट्राची सभ्यता, संस्कृतीचा अवमान होत असेल तर राज्यपाल या पदाचा मान, मरातब गेला चुलीत. ज्या विषयात कळत नाही तिथे चोमडेपणा करू नका, असं काळे यांनी म्हटलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यपालांनी नेमकं काय म्हटलं आहे... 'कधी कधी मी इथं लोकांना म्हणतो की, महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढा, तर तुमच्याकडे पैसाच राहणार नाही. तुम्ही जे मुंबईला आर्थिक राजधानी म्हणताय ती राजधानी राहणारच नाही', असं राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटलं आहे.