अहमदनगरमध्ये महिलेला घरासह पेटवलं, शेतीचंही नुकसान
एबीपी माझा वेब टीम | 06 Apr 2017 04:24 PM (IST)
अहमदनगर : अहमदनगरमध्ये नेवासा तालुक्यात एका महिलेला घरासह पेटवून मारहाण करण्यात आली आहे. या आगीत संगीता राव ही महिला भाजली आहे, तर शारदा राव ही महिला जखमी झाली आहे. नेवासा तालुक्यातील संगीता राव या महिलेला विजेच्या डीपीमुळे पेटवून मारहाण केल्याचा आरोप राव कुटुंबियांनी केला आहे. बुधवारी रात्री 9 जणांच्या जमावानं शारदा राव यांना मारहाण करत घरही पेटवलं. याप्रकरणी भरत आगळे याच्यासह 8 जणांच्या जमावानं घर पेटवत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन महिलांना मारहाण करत दोन एकर ऊस आणि पंधरा पोती गहूही पेटवण्यात आला आहे. एक महिन्यापासून वीज पुरवठा बंद केल्यानं शेतीचं नुकसान करण्यात आल्याचं बोललं जात आहे.