Devendra Fadnavis on Nana Patole : राज्यपालांचा अभिभाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेमध्ये संबोधित केले. यावेळी बोलताना फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेत सहभाग घेतलेल्या आमदारांची नावे वाचून दाखवली आणि जवळपास 17 टक्के आमदारांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेत सहभाग घेतल्याचे सांगितले. मात्र, हे सांगत असताना त्यांनी नाना पटोले यांचा चर्चेमध्ये सहभाग झाला नसल्याचे दाखवून देत खोचक टिप्पणी केली. हे बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनाही मध्ये खेचले.
नानाभाऊंनी चर्चेत का सहभाग घेतला नाही?
फडणवीस म्हणाले की नानाभाऊंनी चर्चेत का सहभाग घेतला नाही? की नानाभाऊंचं नाव काँग्रेसने इतर सुद्धा कापलं आहे? आमच्या विदर्भाचा बुलंद आवाज असा कोणी दाबायचा प्रयत्न केला तर ते बरोबर नसल्याची खोचक टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. नानाभाऊ आमचा बुलंद आवाज असल्याचे ते म्हणाले. गेल्या चार दिवसांपासून ते रंगीबेरंगी कपडे घालून घेत होते त्यामुळे ते वेगळ्या मुडमध्ये आहेत का? असे वाटत होते. मात्र, आज ते पुन्हा एकदा पांढऱ्या कपड्यात आल्याची टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्री भाषणात काय म्हणाले?
- सोयाबीन खरेदी ही विक्रमी आहे
- मध्य प्रदेश हा सर्वाधिक सोयाबीन उत्पादक राज्य आहे. मात्र, सर्वाधिक खरेदी महाराष्ट्र केली आहे
- आतापर्यंत सर्वाधिक खरेदीचा रेकाॅर्ड मोडला आहे. काही लोकांची खरेदी राहीली आहे
- तुर खरेदी करायला गोडाऊन नाही, त्यामुळे खासगी गोडाऊन घेऊन आपण तूर खरेदी केली आहे
- सिंचनाच्या क्षेत्रात मोठ काम आपण केलं आहे
- महाराष्ट्रातला कायमस्वरुपी दुष्काळ मुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे
- सात जिल्ह्यांतील 10 लाख एकर जमिनीला फायदा होईल
- 426 किमीचे नवीन कालवा तयार करत आहे
- प्रकल्प अहवाल तयार होऊन काम सुरू करायला दोन वर्ष लागतील
- मराठवाड्याला पाणी वळवण्यासाठी आपण निविदा काढली आहे
- जायकवाडी वरील बाजूस धरणे बांधली त्यामुळे तूट निर्माण झाला. त्यामुळे वाद निर्माण होतात, ते बंद होतील
- पिण्यासाठी मराठवाड्यात पाणी उपलब्ध होईल
- संभाजीनगर व जालना हे नवीन औद्योगिक क्लस्टर निर्माण होत आहे, त्याला या पाण्याचा फायदा होईल.
इतर महत्वाच्या बातम्या