Weather: राज्यात उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट आली असून, ती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. तर मुंबई परिसरासह कोकण विभागातील किमान तापमान अद्यापही सरासरीपुढे आहे.


उत्तर भारतात देखील तापमानात बदल झाला आहे. तेथील थंडी कमी झाली आहे. त्या ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. दिल्लीपासून ते ग्वाल्हेर, भोपाळ, सुरत आणि हैदराबादपर्यंत उष्णतेचा प्रकोप जोर धरु लागला आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये उष्णतेची लाट आली आहे. या उष्णतेचा मोठा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे.  हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार,  आजही राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये कडक ऊन पडणार आहे. विशेषत: पश्चिम राजस्थानमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत उष्णतेत आणकी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


राजस्थानपासून गुजरातपर्यंत असलेल्या उष्णतेच्या लाटेचा परिणाम म्हणून मुंबई परिसरासह कोकण विभागात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली होती. मुंबई परिसराचे कमाल तापमान सरासरीच्या तुनलेत 5 ते 6 अंशांनी वाढले होते. सध्याही मुंबई परिसरातील कमाल तापमान सरासरीच्यचा तुलनेत अधिक आहे. राजस्थान, दक्षिण मध्य प्रदेश आणि तेलंगणा आदी राज्यांमध्ये सध्या उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. विदर्भातही काही भागात उष्णतेची लाट आली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सोलापूर आदी भागांतही कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ते 3 ते 4 अंशांनी वाढले आहे. राज्यात आणखी एक ते दोन दिवस तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभादानं वर्तवली आहे. 


महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?


अकोला 42.07
जळगाव 42.06
वर्धा 41.04
नागपूर 40.04
अमरावती 41.04
सोलापूर 41.06
नाशिक 39.01
सांगली 40.04
कोल्हापूर 39.05
 गोंदिया 39.08


दरम्यान, जळगाव, अकोला, अमरावती, बुलडाणा, सांगली वर्धा, गोंदिया या भागामध्ये तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने दक्षिण कोकण भागातही तुरळक ठिकाणी आज आणि उद्या हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.


महत्त्वाच्या बातम्या: