अवघ्या वर्षभरापूर्वीच निखिल सेलोरेचा कल्याणीसोबत प्रेमविवाह झाला होता. पण लग्नानंतर दोन महिन्यांतच निखिलने कल्याणीकडे माहेराहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. त्यातच कल्याणीने मुलीला जन्म दिल्याने त्याचा संताप वाढला.
मागील अनेक दिवस त्यांच्यात यावरुन भांडणं, वादावादी सुरु होती. अखेर बुधवारी रात्री संतापाच्या भरात निखिलने कल्याणीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करत तिची हत्या केली. त्यानंतर शेजारी झोपलेल्या दोन महिन्यांच्या चिमुकलीचीही गळा दाबून हत्या केली.