मुंबई : राज्यात पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. 26 जिल्ह्यांमधील 1041 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आणि 69 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्तपदांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली.


या ग्रामपंचायतींसाठी 26 सप्टेंबर रोजी मतदान होईल, तर 27 सप्टेंबरला मतमोजणी होईल. या ठिकाणी आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.

ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी हे मतदान होत आहे. यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे.

कसा आहे निवडणूक कार्यक्रम?

नामनिर्देशनपत्रे 5 ते 11 सप्टेंबर 2018

छाननी 12 सप्टेंबर 2018 रोजी

नामनिर्देशनपत्रे  15 सप्टेंबर 2018 पर्यंत मागे घेता येतील आणि त्याच दिवशी चिन्ह वाटप

मतदान 26 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत

गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल.

मतमोजणी 27 सप्टेंबर 2018 रोजी

कोणकोणत्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक?

ठाणे- 6, रायगड- 121, रत्नागिरी- 19, सिंधुदुर्ग- 4, नाशिक- 24, धुळे- 83, जळगाव- 6, अहमदगनर- 70, नंदुरबार- 66, पुणे- 59, सोलापूर- 61, सातारा- 49, सांगली- 3, कोल्हापूर- 18, बीड- 2, नांदेड- 13, उस्मानाबाद- 4, लातूर- 3, अकोला- 3, यवतमाळ- 3, बुलडाणा- 3, नागपूर- 381, वर्धा- 15, चंद्रपूर- 15, भंडारा- 5 आणि गडचिरोली- 5. एकूण- 1041.

कोणकोणत्या ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक?

ठाणे- 4, रायगड- 3, सिंधुदुर्ग- 1, नाशिक- 8, धुळे- 2, जळगाव- 1, पुणे- 6, सातारा- 3, सांगली- 10, उस्मानाबाद- 1, जालना- 2, यवतमाळ- 3, वाशीम- 6, बुलडाणा- 2, नागपूर- 1, चंद्रपूर- 2 आणि गडचिरोली- 14. एकूण- 69.