हिंगोलीत गाव विक्रीला काढले...! दुष्काळ, नापिकी, बेरोजगारीला गावकरी कंटाळले
एबीपी माझा वेब टीम | 20 Jul 2019 10:53 AM (IST)
शेती कोरडवाहू असल्याने आणि सतत दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. हंगामी पावसाचे चार थेंब आल्यावर कपाशी, सोयाबीन अशी पीकं घेतली जायची. मात्र गेली सलग चार वर्षे या गावाकडे पाऊस फिरकलाच नाही.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील एक गाव गावकऱ्यांनी विक्रीला काढल्याने खळबळ उडाली आहे. सलग चार वर्षांपासूनचा दुष्काळ, त्यातून आलेली नापिकी, कर्जबाजारीपणा आणि बेरोजगारीच्या दुष्टचक्रात सापडलेल्या हिंगोलीमधील सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्रित येत चक्क गावच विक्रीला काढले आहे. गावाच्या विक्रीसोबत सरकारकडे इच्छा मरणाची परवानगी गावकऱ्यांनी मागितल्यामुळे खळबळ उडाली आहे. सेनगाव तालुक्यातील ताकतोडा हे 3000 हजार लोकसंख्या वस्ती असलेले गाव आहे. शेती हेच त्यांच्या एकमेव उदरनिर्वाहाचे साधन आहे. शेती कोरडवाहू असल्याने आणि सतत दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. हंगामी पावसाचे चार थेंब आल्यावर कपाशी, सोयाबीन अशी पीकं घेतली जायची. मात्र गेली सलग चार वर्षे या गावाकडे पाऊस फिरकलाच नाही. यंदाही जुलै महिना संपत आला तरी पाऊस आलेला नाही. पाण्याअभावी पेरणी केलेली पीकं सध्या करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. बँकांच्या आडमुठ्या धोरणामुळे पीककर्जापासून शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी खासगी बँकांचे, सावकाराचे कर्ज काढून पेरण्या केल्या आहेत. सलग तीन ते चार वर्षापासून पीक संरक्षण विमा देखील मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी शेवटचा मार्ग काढून एकत्र येत ताकतोडा गाव विक्रीला काढले आहे. मागण्या मान्य करा अथवा संपूर्ण गावाला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. काय आहेत नागरिकांच्या मागण्या