Vidarbha Weather Update नागपूर : सूर्यानं 25 मे पासून रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला असून विदर्भात नव तपाला (Nautapa 2024) सुरुवात झाली आहे. नव तपाच्या पहिल्याच दोन दिवसात विदर्भात (Vidarbha) विक्रमी तापमानाची नोंद (Temperature) झाली असून पारा 45 आणि 46 अंशांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे नव तपाचे पुढील सात दिवस विदर्भवासियांसाठी आणखी कठीण जाणार आहेत. हवामान विभागानेही 29 मे पर्यंत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे वैदर्भीय जनतेने उष्माघातापासून बचाव करण्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. 

Continues below advertisement

पुढील सात दिवस विदर्भवासियांसाठी कठीण 

विदर्भात (Vidarbha) गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) विश्रांती घेतल्यानंतर काल दुपार नंतर पुन्हा अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दुपारपर्यंत अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेच्या लाटेने (Temperature) हैराण झालेला नागरिकांना दुपारनंतर मात्र अवकळी पावसासह सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटाचा सामना करावा लागला. अचानक आलेल्या दमदार पावसाने यवतमाळ, बुलढाणा, अकोला, नागपूरसह इतरत्र एकच दाणादाण उडवली. यात अनेक अपघात झाल्याच्या घटनाही आता समोर येऊ लागल्या आहे.

उकाड्यापासून लोकांचे हालेहाल

दुसरीकडे शनिवारपासून सुरू झालेल्या नवतपाने विदर्भातील नागरिकांना चांगलेच होरपळले आहे. पहिल्या दिवशी विदर्भात विक्रमी तापमानाची नोंद झाली असून पारा 45 आणि 46 अंशांच्या घरात पोहोचला आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्यामुळे उकाड्यापासून लोकांचे हालेहाल झाल्याचे बघायला मिळाले आहे. पुढील काही दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या सोबतच विदर्भात तापमान 44 ते 49 अंशापर्यंत वाढणार असल्याचा इशाराही दिला आहे. 

Continues below advertisement

यवतमाळ जिल्ह्यात विक्रमी तापमामाची नोंद 

यवतमाळ जिल्ह्यात आज 46 अंश सेल्सिअस अशी विक्रमी तापमामाची नोंद झाली आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यातील हे सर्वोच्च तापमान ठरले असून गेल्या पाच वर्षांतले हे सर्वाधिक तापमान असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर काल दिवसभराच्या कडक उन्हानंतर सायंकाळच्या सुमारास यवतमाळच्या आर्णी आणि महागाव तालुक्याला अवकाळी पाऊस आणि वादळीवाऱ्याचा जोरदार फटका बसला आहे. या वादळामुळे अनेक घरावरील तीन पत्र उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर यात एकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

वादळी वाऱ्यामुळे 25 घरांची पडझड

यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील पाभळ तर महागांव तालुक्यातील तिवरंग, चिखली, मलकापूर या गावांना वादळाचा तडाखा बसला. पाभळ येथील 25 घरांची पडझड झाली आहे. तर अनेक घरावरील टिनपत्रे उडाल्याची माहिती समोर आली आहे. या सोबतच अनेक मोठी झाडे उन्मळून पडली असल्याने काही रस्ते  देखील काही काळ बंद झाले होते. एकुणात अवकाळी पावसाने आज जिल्ह्यात एकच दाणादाण उडवल्याचे चित्र आहे.   

इतर महत्वाच्या बातम्या