मुंबई : मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या नेतृत्वाबद्दल खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे यांना समाजाकडून आवाहन केलं जात आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरुन या दोन्ही राजेंवर जहरी टीका केली. पुण्यात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, दोन्ही राजांचा आंदोलनाला पाठिंबा आहे, असं मला वाटत नाही. यातील एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती यांनी भूमिका घेतली आहे पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देत आहेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांनी यावेळी मराठा आरक्षणासाठी 10 तारखेला पुकारलेल्या बंदला पाठिंबा दिला आहे.


आंबेडकर म्हणाले की, दोन्ही राजांचा 10 तारखेच्या आंदोलनाला पाठिंबा आहे असं मला वाटत नाही. यातील एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती हे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देतायत. ज्या व्यक्तिला घटना माहीत नाही, जो व्यक्ती असं म्हणतो की आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर कोणालाच मिळू नये याला भाजपने राज्यसभेवर कसं पाठवलं याचं आश्चर्य आहे. मी कोणालाही अंगावर घ्यायला घाबरत नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.


ते म्हणाले की, मराठा समाजाने महाराष्ट्राला आतापर्यंत खुप चांगले नेतृत्व दिले आहे.  ते नेतृत्त्व सगळ्यांचा विचार करणारे होते.  आता जे नेतृत्व करत असल्याचं दाखवतायत ते खुजे आहेत. स्वतःच आस्तित्व टिकवण्यासाठी जातीचा आधार घेत आहेत, असं आंबेडकर म्हणाले.


प्रकाश आंबेडकर  म्हणाले की, मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी फोन करुन 10 तारखेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची मागणी केली.  त्यानुसार 10 तारखेच्या बंदला आमचा पाठिंबा असेल.  हा पाठिंबा देताना मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण वेगळं आहे हे समजताच तो आम्ही त्यांना सांगितले आहे आणि ओ बी सी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे आम्ही सांगितलं आहे, असंही ते म्हणाले.


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वातावरण बिघडताना दिसतेय.  वेगवेगळ्या मराठा संघटना आक्रमक होताना दिसतेय. त्यांच्यात कलह होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रील वातावरण बिघडू  नये यासाठी आम्ही 10 तारखेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आरक्षण कोणाला द्यायचं याचा अधिकार राज्य सरकारला नाही तर केंद्र सरकारला आहे, असंही आंबेडकर म्हणाले.


एमपीएससीच्या परीक्षेला विरोध करणारे मराठा नेते मराठा आरक्षणाच्या पायावर धोंडा पाडून घेतायत. एमपीएससीची परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. एमपीएससीची परीक्षा हा सर्वच समाजातील विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, असं आंबेडकर म्हणाले.


VIDEO | नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर



संबंधित बातम्या


एमपीएससी परीक्षा पुढे ढकला अन्यथा होणाऱ्या नुकसानाला सरकार जबाबदार : खासदार संभाजीराजे


नवी मुंबईतील मराठा समाजाच्या बैठकीला उदयनराजेंची पाठ, साताऱ्यात राज्यव्यापी मेळावा घेणार


MPSC Exam | एमपीएससी परीक्षेवरुन मराठा विद्यार्थी, संघटनांमध्ये मतमतांतर